शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतमालाला हमीभाव द्या

By admin | Updated: October 20, 2016 01:08 IST

देशभरांत शेती नफ्यात येत नाही म्हणून लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे. विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या ...

यशंवत झाडे : शेतकरी मेळाव्यात शेतकरी कर्जमुक्तीचा ठराववर्धा : देशभरांत शेती नफ्यात येत नाही म्हणून लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे. विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्यांमध्ये आणखीच वाढ झाली आहे. उत्पादन वाढले, जास्त पिकले तर बाजारपेठेत शेतमालाचे दर पडतात. उत्पादन वाढले तरी उत्पन्न वाढत नाही. तेव्हा स्वामीनाथन कमिशनप्रमाणे शेतमालाचे हमी दर निश्चित करावे, असे प्रतिपादन समुद्रपूर येथील शेतकरी मेळाव्यात किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी केले. नापिकी झाली तर सरकार विदेशातून गहू, तांदूळ, डाळ याची आयात करून भाव पाडते. अशास्थितीत शेतकऱ्यांना वाढत्या महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे दरवर्षी शेतमालाचे हमी दर कृषी मूल्य आयोगाने पेरणीपूर्वी जाहीर करावे. ते दर बाजारपेठेत शेतकऱ्यांना मिळतील अशी व्यवस्था केंद्र व राज्य सरकारने करावी, असेही ते म्हणाले. समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मेळावा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी बाळकृष्ण तिमांडे होते तर प्रमुख अतिथी मंचावर यशवंत झाडे, चंद्रभान नाखले, महेश दुबे, जानराव नागमोते, गजानन ढोरे, जगन चांभारे उपस्थिते होते. याप्रसंगी प्रमुख अतिथींनी शेतकरी समस्या व त्यावरील उपाय यावर समयोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी स्वामीनाथन कमिशनप्रमाणे शेतमालाचे दर केंद्र सरकारने जाहीर करावे व सर्व शेतकऱ्यांना कर्जमूक्ती द्यावी, असा ठराव महेश दुबे यांनी मांडला. त्याला जगन चांभारे यांनी अनुमोदन दिले. सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. कार्यक्रमासाठी महेश चांभारे, विजय अवचट, रामभाऊ खेळकर, आनंदराव पिदुरकर, आत्माराम कोळसे, बिजाराम नेहारे, भास्कर डवरे, घनश्याम डफ, रमाकांत वैरागडे, बाबाराव वैरागडे आदिंनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद नगराळे यांनी केले.