शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोटींच्या थकबाकीने महावितरणची बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

पाणी योजनांची थकीत वीज देयकाची परिस्थिती म्हणजे शेतकऱ्यांसाठी वारंवार होणाऱ्या कर्जमाफी सारखी झाली आहे. कर्जमाफी होणार म्हणून काही शेतकरी कर्जच भरत नाहीत. असेच काहीतरी सुट अथवा संपूर्ण थकीत रक्कम माफ होईल, या आशेने अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या पाणीपुरवठाच्या वीज देयकाच्या बाबतीतही होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजनेचे देयक रखडले : १ हजार ११९ ग्राहकांनीही फिरविली पाठ

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा विभागासह आर्वी आणि हिंगणघाट या तीन उपविभागातील ग्रामपंचायतीच्या १ हजार ११९ ग्राहकांकडे पाणीपुरवठा योजनेच्या देयकापोटी तब्बल ३ कोटी २५ लाख ५० हजार ९१३ रूपयांची थकबाकी असल्याने महावितरणचीच बत्तीगूल झाली आहे. या देयकांच्या वसुलीकरिता महावितरण कंपनी सरसावली असून ‘थकबाकी भरा अन्यथा वीज पुरवठा खंडीत करा’ असे धोरण स्वीकारले आहे. याबद्दल ग्रामपंचायतींनाही सूचना दिल्या असून प्रतिसाद मिळाला नाही तर प्रत्यक्ष कारवाई संकेतही अधिकाऱ्यांनी दिले आहे.पाणी योजनांची थकीत वीज देयकाची परिस्थिती म्हणजे शेतकऱ्यांसाठी वारंवार होणाऱ्या कर्जमाफी सारखी झाली आहे. कर्जमाफी होणार म्हणून काही शेतकरी कर्जच भरत नाहीत. असेच काहीतरी सुट अथवा संपूर्ण थकीत रक्कम माफ होईल, या आशेने अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या पाणीपुरवठाच्या वीज देयकाच्या बाबतीतही होत असल्याचे चित्र आहे. पाणी योजनांची वीज देयक थकीत पडद्यामागचे मूळ संबंधित ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टी वसुलीत पाहायला मिळते. काही ग्रामपंचायतींचे पाणीपुरवठ्याचे नियोजन अवाक्याबाहेर असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे पहावयास मिळते.गावस्तरावर पाणीपट्टी वसुलीत हयगय होत असल्याने वीज देयक भरण्यासाठी ग्रामपंचायतींना कसरत करावी लागते. मुळात गावांमधील ग्राहकांकडून कडक वसुलीचे धोरण ग्रामपंचायतीने स्वीकारल्यास देयक थकीत पडण्याचे प्रमाणही कमी होईल. परंतु, तसे होताना दिसत नाही.ग्रा.पं.कडे येरझारा, देयक भरण्यास चालढकलदंड, व्याज माफ आणि ५० टक्के रकमेत हप्ते पाडून देण्याची योजना आणली होती. त्याला बहुतांशी ग्रामपंचायतीतून प्रतिसादही मिळाला. परंतु, दोन वर्षापासून यासंदर्भात योजना राबविली नाही. परिणामी, थकबाकीचा आलेख वाढतच गेला. वसुलीसाठी गावागावातील वायरमन ग्रामपंचायतींकडे येरझऱ्या मारतात. परंतु, त्यांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. कारवाईचा इशारा दिल्यानंतर काही रक्कम भरली जाते. वीजपुरवठा सुरळीत करून घेतल्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती निर्माण होते.काही ग्रामपंचायती चालू वीज देयकही भरण्याकडे दुर्लक्ष करतात. थकीत राहू द्या, आपण चालू तरी भरा, अशी महावितरणने कितीही हाक दिली तरीही अशा ग्रामपंचायतींवर कोणताच परिणाम होत नाही. आता थकबाकीची रक्कम ३ कोटीवरे पोहोचल्याने महावितरणने हा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. कर्मचाऱ्यांकडून ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जात आहेत. प्रतिसाद मिळाला नाही तर नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला जाईल, त्यानंतरही थकबाकी भरली नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.चालू वीज देयकांची वसुली करण्यात येत आहे. जी थकीत रक्कम आहे. त्याची वसुली करण्यासाठी धडक वसुली मोहिम राबविण्यात येत आहे. नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. जे ग्राहक थकीत वीज देयके भरणार नाहीत, त्यांची वीज खंडीत करण्यात येईल.डॉ. सुरेश वानखेडे, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :mahavitaranमहावितरण