शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेनेचे सरकार खोटारडे व निष्क्रिय, हल्लाबोल पदयात्रेत अजित पवारांची सरकारवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 18:10 IST

राज्यातील भाजपा-शिवसेनेचे सरकार खोटारडे व निष्क्रिय सरकार आहे. या सरकारच्या विरोधात कॉँग्रेससह समविचारी पक्षांना एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी विधानसभेत घेरणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

दापोरी (वर्धा) -  राज्यातील भाजपा-शिवसेनेचे सरकार खोटारडे व निष्क्रिय सरकार आहे. या सरकारच्या विरोधात कॉँग्रेससह समविचारी पक्षांना एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी विधानसभेत घेरणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. हल्लाबोल पदयात्रेचे वर्धा जिल्ह्यात आगमण झाल्यानंतर सोमवारी दापोरी शिवारात गावात पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे खोटारडे सरकार आतापर्यंत झाले नाही. निवडणुकीच्या वेळी लोकांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. निवडणुका नाही म्हणून आता शेतक-यांना कोणतीही मदत दिली जात नाही. शेतक-यांच्या प्रश्नांकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ८९ लाख शेतक-यांचे ३५ हजार कोटीचे कर्ज माफ करू, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु एकाही शेतक-याच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे आलेले नाही.

मागील तीन वर्षात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पुर्णपणे ढासळली आहे. देशातील पाच शहरांच्या क्राईम रेशोमध्ये महाराष्ट्रातील  तीन शहर आहे. मागील तीन वर्षात महाराष्ट्रात एकही नवा उद्योग आला नाही. आम्ही १९६० पासून राज्य चालविले. त्यावेळी राज्यावर २ लाख ९६ हजार कोटी रूपयांचे कर्ज होते. या सरकारने आता हे कर्ज ४ लाख ५० हजार कोटीवर नेवून ठेवली आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. 

समाजातला कोणताच घटक या सरकारच्या कामकाजावर समाधानी नाही. शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी पैसा उभा करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन विकास आराखड्यात ३० टक्के कपात करण्यात येत आहे. किटकनाशकाच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात ३० शेतक-यांच्या मृत्यू झाला. बी.टी कापसाच्या बियाणांवर संशोधनाचे काम आघाडी सरकारच्या काळात सुरू झाले होते. मात्र या सरकारच्या काळात हे काम ठप्प झाले. एकाही शेतमालाला हमी भाव या सरकारने दिलेला नाही. त्यामुळे या सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येत आहे. व १२ डिसेंबरला राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या नेतृत्वात सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले जाणार आहे, असे अजीत पवार यांनी सांगितले. शेतक-यांच्या कापसाला बोनस जाहिर केला पाहिजे व कोणत्या शेतक-याच्या खात्यावर किती रक्कम कर्जमाफीची जमा झाली. याची माहिती विधीमंडळात सरकारला मागणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. 

विदर्भावर अधिक लक्ष देणारराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात विदर्भातून सर्वात कमी जागा मिळतात. आमच्याविषयी भाजपवाल्यांनी हे पश्चिम महाराष्ट्राकडे निधी पळवितात, अशी प्रतिमा तयार करून ठेवली आहे व तसा आरोप केला जातो. ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी आगामी काळात विदर्भावर अधिक लक्ष आम्ही केंद्रीत करणार असल्याचे अजीत पवार यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेस