शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

भाजपा-शिवसेनेचे सरकार खोटारडे व निष्क्रिय, हल्लाबोल पदयात्रेत अजित पवारांची सरकारवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 18:10 IST

राज्यातील भाजपा-शिवसेनेचे सरकार खोटारडे व निष्क्रिय सरकार आहे. या सरकारच्या विरोधात कॉँग्रेससह समविचारी पक्षांना एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी विधानसभेत घेरणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

दापोरी (वर्धा) -  राज्यातील भाजपा-शिवसेनेचे सरकार खोटारडे व निष्क्रिय सरकार आहे. या सरकारच्या विरोधात कॉँग्रेससह समविचारी पक्षांना एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी विधानसभेत घेरणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. हल्लाबोल पदयात्रेचे वर्धा जिल्ह्यात आगमण झाल्यानंतर सोमवारी दापोरी शिवारात गावात पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे खोटारडे सरकार आतापर्यंत झाले नाही. निवडणुकीच्या वेळी लोकांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. निवडणुका नाही म्हणून आता शेतक-यांना कोणतीही मदत दिली जात नाही. शेतक-यांच्या प्रश्नांकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ८९ लाख शेतक-यांचे ३५ हजार कोटीचे कर्ज माफ करू, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु एकाही शेतक-याच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे आलेले नाही.

मागील तीन वर्षात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पुर्णपणे ढासळली आहे. देशातील पाच शहरांच्या क्राईम रेशोमध्ये महाराष्ट्रातील  तीन शहर आहे. मागील तीन वर्षात महाराष्ट्रात एकही नवा उद्योग आला नाही. आम्ही १९६० पासून राज्य चालविले. त्यावेळी राज्यावर २ लाख ९६ हजार कोटी रूपयांचे कर्ज होते. या सरकारने आता हे कर्ज ४ लाख ५० हजार कोटीवर नेवून ठेवली आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. 

समाजातला कोणताच घटक या सरकारच्या कामकाजावर समाधानी नाही. शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी पैसा उभा करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन विकास आराखड्यात ३० टक्के कपात करण्यात येत आहे. किटकनाशकाच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात ३० शेतक-यांच्या मृत्यू झाला. बी.टी कापसाच्या बियाणांवर संशोधनाचे काम आघाडी सरकारच्या काळात सुरू झाले होते. मात्र या सरकारच्या काळात हे काम ठप्प झाले. एकाही शेतमालाला हमी भाव या सरकारने दिलेला नाही. त्यामुळे या सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येत आहे. व १२ डिसेंबरला राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या नेतृत्वात सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले जाणार आहे, असे अजीत पवार यांनी सांगितले. शेतक-यांच्या कापसाला बोनस जाहिर केला पाहिजे व कोणत्या शेतक-याच्या खात्यावर किती रक्कम कर्जमाफीची जमा झाली. याची माहिती विधीमंडळात सरकारला मागणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. 

विदर्भावर अधिक लक्ष देणारराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात विदर्भातून सर्वात कमी जागा मिळतात. आमच्याविषयी भाजपवाल्यांनी हे पश्चिम महाराष्ट्राकडे निधी पळवितात, अशी प्रतिमा तयार करून ठेवली आहे व तसा आरोप केला जातो. ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी आगामी काळात विदर्भावर अधिक लक्ष आम्ही केंद्रीत करणार असल्याचे अजीत पवार यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेस