शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणावर प्रशासन अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

वर्धा तालुक्यात सुमारे ३ हजार ८८६.०६ हेक्टर, सेलू सुमारे ७ हजार २३.५७३ हेक्टर, देवळीत सुमारे १६ हजार ४८०.८२ हेक्टर, आर्वी सुमारे २ हजार ६०७.१७ हेक्टर, आष्टी तालुक्यात सुमारे १० हजार ९७७.६५ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात सुमारे २ हजार ३१२.३८ हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यात सुमारे ८ हजार ७८९.८६ हेक्टर शासकीय जमीन आहे. परंतु, सध्यास्थितीत किती शासकीय जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे याची ठोस माहितीच जिल्हा प्रशासनाकडे नाही.

ठळक मुद्देदुर्लक्षित धोरण जबाबदार : ५२,०७७.५१३ हजार हेक्टर जमीन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याचे वास्तव आहे. परंतु, नेमक्या किती जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे याची माहितीच सध्या जिल्हा प्रशासनाकडे नसल्याचे उजेडात आले आहे. या प्रकाराला दुर्लक्षीत धोरण जबाबदार असल्याची चर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात होत आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा तालुक्यात सुमारे ३ हजार ८८६.०६ हेक्टर, सेलू सुमारे ७ हजार २३.५७३ हेक्टर, देवळीत सुमारे १६ हजार ४८०.८२ हेक्टर, आर्वी सुमारे २ हजार ६०७.१७ हेक्टर, आष्टी तालुक्यात सुमारे १० हजार ९७७.६५ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात सुमारे २ हजार ३१२.३८ हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यात सुमारे ८ हजार ७८९.८६ हेक्टर शासकीय जमीन आहे. परंतु, सध्यास्थितीत किती शासकीय जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे याची ठोस माहितीच जिल्हा प्रशासनाकडे नाही.दिवसेंदिवस लोकवसाहती वाढत असून बोगस एनए आणि टीपीचा गौडबंगाल कायम असताना जिल्हा प्रशासनाकडे शासकीय जमिनींवरील अतिक्रमणाची माहितीच नसल्याने अधिकाऱ्यांचे दुर्लक्षीत धोरण भूखंड माफियांसाठी चांदीच ठरत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष देत तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.कारंजा(घा.) तालुक्यात शासकीय जागाच नाही?कारंजा (घा.) तालुक्यात एकूण सुमारे ३ हजार ३७१ शासकीय जमिनींचे सर्वे क्रमांक आहेत. परंतु, या तालुक्यात नेमकी किती हेक्टर शासकीय जमीन आहे याचीही आकडेवारी सध्या जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्यामुळे कारंजा (घा.) तालुक्यात शासकीय जमीन नाही काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.ज्यांच्या अधिकारक्षेत्रात जमीन तोच विभाग काढणार अतिक्रमणराष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात एकूण सुमारे ५२ हजार ७७.५१३ हेक्टर शासकीय जमीन आहे. याच जिल्ह्यातून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान यज्ञाला सुरूवात करीत त्याला दिशा देण्याचे काम केले. परंतु, त्यांच्याच कर्मभूमीतील किती शासकीय जमिनीवर सध्या अतिक्रमण आहे याची आकडेवारीच जिल्हा प्रशासनाकडे नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या अधिकारक्षेत्रात शासकीय जमीन आहे त्याच विभागाकडे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी शासनाच्या सूचनेवरून देण्यात आल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण