शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणावर प्रशासन अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 6:00 AM

वर्धा तालुक्यात सुमारे ३ हजार ८८६.०६ हेक्टर, सेलू सुमारे ७ हजार २३.५७३ हेक्टर, देवळीत सुमारे १६ हजार ४८०.८२ हेक्टर, आर्वी सुमारे २ हजार ६०७.१७ हेक्टर, आष्टी तालुक्यात सुमारे १० हजार ९७७.६५ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात सुमारे २ हजार ३१२.३८ हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यात सुमारे ८ हजार ७८९.८६ हेक्टर शासकीय जमीन आहे. परंतु, सध्यास्थितीत किती शासकीय जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे याची ठोस माहितीच जिल्हा प्रशासनाकडे नाही.

ठळक मुद्देदुर्लक्षित धोरण जबाबदार : ५२,०७७.५१३ हजार हेक्टर जमीन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याचे वास्तव आहे. परंतु, नेमक्या किती जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे याची माहितीच सध्या जिल्हा प्रशासनाकडे नसल्याचे उजेडात आले आहे. या प्रकाराला दुर्लक्षीत धोरण जबाबदार असल्याची चर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात होत आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा तालुक्यात सुमारे ३ हजार ८८६.०६ हेक्टर, सेलू सुमारे ७ हजार २३.५७३ हेक्टर, देवळीत सुमारे १६ हजार ४८०.८२ हेक्टर, आर्वी सुमारे २ हजार ६०७.१७ हेक्टर, आष्टी तालुक्यात सुमारे १० हजार ९७७.६५ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात सुमारे २ हजार ३१२.३८ हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यात सुमारे ८ हजार ७८९.८६ हेक्टर शासकीय जमीन आहे. परंतु, सध्यास्थितीत किती शासकीय जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे याची ठोस माहितीच जिल्हा प्रशासनाकडे नाही.दिवसेंदिवस लोकवसाहती वाढत असून बोगस एनए आणि टीपीचा गौडबंगाल कायम असताना जिल्हा प्रशासनाकडे शासकीय जमिनींवरील अतिक्रमणाची माहितीच नसल्याने अधिकाऱ्यांचे दुर्लक्षीत धोरण भूखंड माफियांसाठी चांदीच ठरत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष देत तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.कारंजा(घा.) तालुक्यात शासकीय जागाच नाही?कारंजा (घा.) तालुक्यात एकूण सुमारे ३ हजार ३७१ शासकीय जमिनींचे सर्वे क्रमांक आहेत. परंतु, या तालुक्यात नेमकी किती हेक्टर शासकीय जमीन आहे याचीही आकडेवारी सध्या जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्यामुळे कारंजा (घा.) तालुक्यात शासकीय जमीन नाही काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.ज्यांच्या अधिकारक्षेत्रात जमीन तोच विभाग काढणार अतिक्रमणराष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात एकूण सुमारे ५२ हजार ७७.५१३ हेक्टर शासकीय जमीन आहे. याच जिल्ह्यातून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान यज्ञाला सुरूवात करीत त्याला दिशा देण्याचे काम केले. परंतु, त्यांच्याच कर्मभूमीतील किती शासकीय जमिनीवर सध्या अतिक्रमण आहे याची आकडेवारीच जिल्हा प्रशासनाकडे नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या अधिकारक्षेत्रात शासकीय जमीन आहे त्याच विभागाकडे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी शासनाच्या सूचनेवरून देण्यात आल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण