शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

आचार्य विनोबांचे पवनार आश्रमातील १३ वर्षे वास्तव्य

By admin | Updated: September 11, 2015 02:30 IST

आचार्य विनोबा भावे यांच्या नावातच त्यांच्या विचार, कार्य व सामाजिक शास्त्राची महानता दिसते.

१२० वा जयंती महोत्सव : १९५१ मध्ये पवनार येथून तेलंगना येथील शिवरामपल्ली सर्वोदय संमेलनासाठी रवाना झाले होतेदिलीप चव्हाण सेवाग्रामआचार्य विनोबा भावे यांच्या नावातच त्यांच्या विचार, कार्य व सामाजिक शास्त्राची महानता दिसते. प्रतिभावान विनोबांनी स्वातंत्र्य चळवळ, भूदान यज्ञ, कांचन मुक्तीचा प्रयोग, गोवंश हत्या बंदी व मांस निर्यात बंदीसाठी उपोषण केले. यासाठीचा सत्याग्रह व राज्य शासनाने केलेला कायदा, हा त्यांचा व सत्याग्रहींचा विजय म्हणावा लागेल. त्यांचे जीवनचरित्र आजही प्रासंगिक असून दिशा व प्रेरणा देणारे आहे. शुक्रवारी विनोबा भावे यांचा जयंती महोत्सव साजरा होतोय.विनायक नरहरी भावे यांचा जन्म कोंकणातील गागोदे या लहानग्या खेड्यात ११ सप्टेंबर १८९५ रोजी झाला. घरचे वातावरण अध्यात्मिक आणि धार्मिक असल्याने ब्रह्मचर्याचा संकल्प त्यांनी केला. तरूणपणात पारतंत्र्यात असलेला देश तर दुसरीकडे अध्यात्माची ओढ. यातूनच त्यांनी गृहत्याग केला. काशीमध्ये अध्ययन केले. तेथेच त्यांना गांधीजींचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली. ते प्रभावित झाले. बापूंसोबत पत्रव्यवहार केल्यानंतर ते १९१६ मध्ये कोचरण आश्रमात गेले आणि तेथीलच झाले. याच ठिकाणी गांधीजींनी त्यांना विनोबा हे नाव दिले. विनोबामधील गुण बापूंनी हेरले. आश्रमातील एक रत्न, असाही बापू त्यांचा उल्लेख करीत. वर्धेत सत्याग्रह आश्रमची स्थापना करण्यात आली. याची जबाबदारी विनोबांवर सोपविण्यात आली. येथूनच त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. कठीण परिश्रम, सखोल अध्ययन, रचनात्मक कार्य, ग्रामसेवेचे शास्त्र त्यांनी निर्माण केले. यातून प्रेरणा घेत सहकारी मनोहर दिवाण यांनी कुष्टरोग्यांसाठी कार्य सुरू केले. ‘महाराष्ट्र धर्म’ या पत्रिकेतून त्यांची साहित्यिक प्रतिभा दिसून आली. संतांचा प्रसाद, मधुकर आदी पुस्तके लोकप्रिय झाले. तुरूंगात असताना गीता प्रवचने लिहिली. पुढे ती २४ भाषेत प्रकाशित झाली. १९३०-३१ मध्ये गिताईची रचना केली. जी महाराष्ट्रात घराघरात पोहोचली. विनोबाजींचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य उल्लेखनीय असेच राहिले. १९२३ मध्ये नागपूर झेंडा सत्याग्रहात तुरूंगवास झाला. १९४० मध्ये प्रथम सत्याग्रही म्हणून गांधीजींनी त्यांची निवड करून उत्तराधिकारी घोषित केले. तीन वर्ष भारत छोडो आंदोलनात कारावास झाला. १९३८ मध्ये ते पवनार येथे आले. १९५१ मध्ये पवनार येथून तेलंगना येथे शिवरामपल्ली सर्वोदय संमेलनाला ते रवाना झाले.