शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

जुलै महिन्यात वर्ध्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 14:10 IST

निम्न वर्धाची तीन दारे उघडली : बुधवारीही जिल्ह्यात येलो अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सद्यःस्थितीत जिल्ह्यात जुने महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून जुलै २०२४ मध्ये ४१८ मि.मी. सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे जलाशयांच्या पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचे सायंकाळी ६ वाजता तीन गेट उघडण्यात आले.

निम्न वर्धा प्रकल्पाची पाणीपातळी २८२.५० मीटर असून सध्या ६५.६१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे तीन गेट उघडले असून त्यातून ३० सेमीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी वर्धा नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी आर्वी तालुक्यातील खरांगणा, वर्धा तालुक्यातील वर्धा व आंजी तसेच सेलू तालुक्यातील झाडसी या चार महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. भारतीय हवामान विभागाने बुधवारी पुन्हा येलो अलर्ट दिला आहे. पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न करून नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आजचे पर्जन्यमानतालुका            मंडळ                    पाऊसआर्वी                 ०६                    ५६.०६ मि.मी.कारंजा               ०४                    ४४.०७ मि.मी.आष्टी                 ०४                     ३४.०९ मि.मी.वर्धा                   ०७                    ४८.०६ मि.मी.सेलू                   ०५                    ६०.०७ मि.मी.देवळी                ०६                    २९.०९ मि.मी.हिंगणघाट           ०८                    १३.०८ मि.मी.समुद्रपूर             ०८                     ३३.०१ मि.मी.

प्रकल्पांच्या पाणी पातळीत झाली वाढ...

  • सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे बोर प्रकल्पात ५०.१६ टक्के जलसाठा आहे. तसेच निम्न वर्धा प्रकल्पात ६३.२० टक्के, धाम प्रकल्पाचा ८४.१६ टक्के, पोथरा प्रकल्पात १००.०२ टक्के जलसाठा असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
  • पंचधारा प्रकल्पात ९४.८६ टक्के, डोंगरगाव प्रकल्पात १००.०९ टक्के जलसाठा असून यातून विसर्ग सुरू आहे. मदन प्रकल्पात ७८.५९ टक्के तर मदन उन्नई प्रकल्प १०० टक्के भरला असून विसर्ग सुरू आहे. लालनाला प्रकल्पात ५८.२८ टक्के जलसाठा असून ५ गेट उघडण्यात आली आहे. वर्धा कार नदी प्रकल्प १०० टक्के भरला असून विसर्ग सुरू आहे व सुकळी लघु प्रकल्प ५३.६३ टक्के भरलेला आहे. 
टॅग्स :WaterपाणीDamधरणWardha Riverवर्धा नदीRainपाऊस