शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

आधार खात्याशी लिंक नसल्याने 73 हजार शेतकरी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 3:29 PM

PM Kisan Scheme : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला ६ हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती.

वर्धा : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला ६ हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. या योजनेत वर्धा जिल्ह्यात १.१३ लाख शेतक-यांची नोंदणी लाभार्थी म्हणून करण्यात आली. मात्र जिल्ह्यातील ७३ हजार ४१८ शेतक-यांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्याने त्यांना या योजनेचा लाभच मिळाला नसल्याची माहिती पुढे आली आहे. वर्धा जिल्ह्यात १ लाख १३ हजार १३ शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र आहे. यापैकी ३९ हजार ४१८ शेतक-यांचे बँक खाते मोबाईल क्रमांक, आधार याच्याशी लिंक करण्यात आले आहे. या शेतक-यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये प्रत्येकी २ हजार प्रमाणे तीन टप्प्यात दिले जात आहे. सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत १.१३ लाख शेतक-यांची नोंदणी या योजनेच्या लाभासाठी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने पीएम किसान पोर्टल येथे हे नावे नोंदविले. यापैकी ७३ हजार ५८७ शेतक-यांचे बँक खाते, मोबाईल क्रमांक, आधारशी लिंक झालेले नाहीत. त्यामुळे केवळ ३९ हजार ४१८ शेतक-यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकला आहे.-----सेवा केंद्रात लिंकचे काम युद्धपातळीवर चालणारजिल्ह्यातील लाभ न मिळालेल्या ७३ हजार ५८५ शेतक-यांची संख्या लक्षात घेऊन आता बँक खाते, मोबाईल क्रमांक व आधार याच्याशी लिंक करण्याचे आदेश सेवा केंद्रांना प्रशासनाने दिले आहे. त्या दृष्टीने सर्व तहसीलदार व महाऑनलाइनचे समन्वयक शेतक-यांचे बँक खाते लिंक करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सदर कामाला गती देण्याच्या दृष्टीने कृषी आयुक्तांनीही जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीAdhar Cardआधार कार्डPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना