शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांत ३६३ नागरिकांना ‘स्रेकबाईट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

शेतीची कामे करताना सर्पदंश होण्याची शक्यता अधिक असते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बिनविषारी साप आहेत. तर विषारी सापांची संख्याही बऱ्यापैकी आहे. साप चावल्यानंतर उपचार म्हणून प्रतिबंधक लस दिली जाते. वाढत्या घटना लक्षात घेता सर्वच केंद्रांवर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देशेतीची कामे करताना दक्षता घेणे गरजेचे

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यात शेतीची कामे करताना सर्पदंशाच्या घटना घडतात. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल ३६३ नागरिकांंना सर्पदंश झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना शेतीची कामे करताना घडल्या असल्याने शेतमजुरांसह शेतकऱ्यांनी दक्ष राहूनच शेतीची विविध कामे करणे गरजेचे आहे.सर्पदंश प्रतिबंधक लसींची उपलब्धता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सुमारे दहा हजार लस उपलब्ध आहे. मात्र, लसींचा वापर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याचा सल्ला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. शेतीची कामे करताना सर्पदंश होण्याची शक्यता अधिक असते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बिनविषारी साप आहेत. तर विषारी सापांची संख्याही बऱ्यापैकी आहे. साप चावल्यानंतर उपचार म्हणून प्रतिबंधक लस दिली जाते. वाढत्या घटना लक्षात घेता सर्वच केंद्रांवर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णांना लसीसाठी खासगी रुग्णालयात पैसे मोजावे लागतात; पण शासकीय रुग्णालयांमध्ये ही लस नि:शुल्क दिली जात असल्याचे सांगण्यात आले.लस संपल्यास तात्काळ उपलब्धसर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध आहे. प्रत्येक आरोग्य केंद्राकडून जेवढी मागणी असेल तेवढ्या लसींचा साठा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जात आहे. सर्पदंश झालेला एखादा रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला सर्व लस देण्यात आल्यावर संबंधितांकडे लसीची मागणी करण्यात येते. त्यानंतर त्वरित लस पुरविण्यात येत.लस असते; पण डॉक्टर नसतात!प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, डॉक्टरच वेळेवर हजर राहत नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे बहुधा खासगी डॉक्टरांचा आधार नागरिकांना घ्यावा लागतो. समस्या लक्षात घेता आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने योग्य कारवाईची गरज आहे.सध्या शेतीची कामे सुरू असल्याने सर्पदंशाच्या घटना घडत आहेत. सर्पदंशाची लस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. सर्पदंश झाल्यावर रुग्णाला तत्काळ नजीकच्या रूग्णालयात न्यावे. शिवाय औषधोपचार घ्यावा.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :snakeसाप