शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

३५ व्यक्तींनी घेतले वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प आणि वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प तसेच विदर्भातील इतर व्याघ्र प्रकल्पामुळे विदर्भ हा वाघांची संख्या वाढविण्यासाठीचे हबच ठरू पाहत आहे. इतकेच नव्हे तर उमरेड-पवनी-कºहांडला हा बोर आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ये-जा करणाऱ्या वन्यप्राण्यांसाठी महत्त्वाचा दूवाच ठरतो.

ठळक मुद्देवनविभागाचा उपक्रम। उमरेड-पवनी-कºहांडलाची जाणली इत्थंभूत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख. पण याच व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेला लागून असलेल्या गाव शिवारात नेहमीच मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष होतात. हाच अनुचित प्रकार टाळता यावा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेवरील गावांमधील काही निवडक नागरिकांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी उमरेड-पवनी-कऱ्हांडला या व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या गावांत भेट देऊन वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष माहिती घेतली.चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प आणि वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प तसेच विदर्भातील इतर व्याघ्र प्रकल्पामुळे विदर्भ हा वाघांची संख्या वाढविण्यासाठीचे हबच ठरू पाहत आहे. इतकेच नव्हे तर उमरेड-पवनी-कºहांडला हा बोर आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ये-जा करणाऱ्या वन्यप्राण्यांसाठी महत्त्वाचा दूवाच ठरतो. याच परिसरात वन्यजीव आणि मानव संघर्ष टळण्यासाठी ग्राम परिस्थितीकी विकास समिती अंतर्गत विविध प्रकारचे कामे करण्यात आली आहेत. ती अनेकांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. या अभ्यास दौऱ्यात वर्धा जिल्ह्यातील सदर ३५ व्यक्तींनी तेथील मनोरा गाव येथील रेशीम उद्योग, सोलरकुंपन, जीम, गांडूळ खत प्रकल्प, १०० टक्के कुºहाड बंदी, १०० टक्के एलपीजी वितरण, गावांमधील बोलक्या भिंती, सौर कंदील आदी कामांची माहिती जाणून घेतली. शिवाय वन्यजीव संगोपनासाठी नेहमीच सहकार्य करू अशी शपथ घेतली. अभ्यास दौऱ्यासाठी गेलेली चमू शुक्रवारी रात्री वर्धेत परतली.अभ्यास दौऱ्यादरम्यान उमरेड-पवनी-कऱ्हांडला येथील सहाय्यक वनसंरक्षक अजीत साजणे, उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी निंबेकर, कुहीचे धनश्याम ठोंबरे, क्षेत्र सहाय्यक निलेश वाडीघरे यांनी वर्धा जिल्ह्यातून आलेल्या ३५ व्यक्तींना विविध विषयांची माहिती दिली. शिवाय वन्यजीवांचे महत्त्व पटवून दिले. या अभ्यास दौऱ्यादरम्यान वन्यप्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या रानवाडी येथील २०० हेक्टरवरील गवत कुरण प्रकल्पाचीही माहीती देण्यात आली. वनविभागाने हा उपक्रम आयोजित केला होता.

टॅग्स :forest departmentवनविभाग