शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 21:28 IST

वीज पडल्याने २९ शेळ्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत शेळी पालकांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने रखवालदार थोडक्यात बचावले.

वर्धा तालुक्यातील जैतापूर शिवारात गुरुवार, २८ रोजी दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, वीज पडल्याने २९ शेळ्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत शेळी पालकांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने रखवालदार थोडक्यात बचावले.शेळ्या दगावल्याची माहिती मिळताच सरपंच छाया विलास उईके यांनी तहसीलदार, बीट अंमलदार आणि तालुका पशुधन विकास अधिकाऱ्यांना माहिती दिली. गावात माहिती होताच ग्रामस्थांनी परिसरात धाव घेतली. विजांचा आवाज होत असताना डोंगरगाव शिवारात चरण्यास गेलेल्या शेळ्यांच्या कळपावर वीज कोसळली. सर्व २९ शेळ्या जागीच दगावल्या. यामधे जैतापूर येथील देविदास उईके यांच्या मालकीच्या १६ शेळ्या, सुरेश चौधरी यांच्या मालकीच्या ४, पंकज सोनोने यांच्या मालकीच्या ३, वसंत कुसराम यांच्या मालकीच्या ३, भगवान जिवतूजी मडावी यांच्या २, किसन भुताजी उईके यांची १ शेळी होती. यासोबत दोन पाळीव श्वानदेखील दगावले. देखभाल करणारे रखवालदार देविदास माधव उईके आणि विश्राम किसना बोटरे हे थोडक्यात बचावले.

घटनास्थळ आहे जंगलात

वीज कोसळली ते स्थळ जंगलात आहे. त्यामुळे सायंकाळी ही घटना माहिती पडली. पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल नानोटकर आणि पशुधन पर्यवेक्षक डॉ. भालचंद्र जाणे यांनी शवविच्छेदन केले. तलाठी सविता भगत तसेच ग्रामसेवक कृष्णा कुरवाडे यांनी सरपंच छाया उईके, पोलिसपाटील सुनीता तंतरपाळे, माजी सरपंच गंगाधर मडावी यांच्या उपस्थितीत पंचनामा करून तहसील कार्यालयात अहवाल सादर केला.५.८० लाखांचे नुकसानपंचनामा करून तहसील कार्यालयात अहवाल सादर केला असता यात शेळी मालकांचे जवळपास ५ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीमुळे नुकसानग्रस्त आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई मंजूर करावी, अशी मागणी सरपंच छाया उईके यांच्यासह ग्रामस्थांकडून केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र