"उंदरांसारखी कुरकुर करतात, पण हिंमत करत नाहीत; 8 वर्षांपासून दंगल नाही"; योगींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:32 IST2025-04-01T15:31:51+5:302025-04-01T15:32:49+5:30

"आता बरेलीमध्ये दंगल होत नाही. सर्व दंगलखोर उंदरांसारखी कुरकुर करतात, पण बाहेर येण्याची हिंमत करत नाहीत. दंगल केली, तर..."

UP They grumble like mice, they but don't dare; there has been no riot for 8 years CM Yogi's attack in bareilly | "उंदरांसारखी कुरकुर करतात, पण हिंमत करत नाहीत; 8 वर्षांपासून दंगल नाही"; योगींचा हल्लाबोल

"उंदरांसारखी कुरकुर करतात, पण हिंमत करत नाहीत; 8 वर्षांपासून दंगल नाही"; योगींचा हल्लाबोल


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी बरेली येथून 'स्कूल चलो अभियान' आणि विशेष संसर्गजन्य रोग नियंत्रण मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला. यावेळी सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत योगी म्हणाले, "ही तीच बरेली आहे जिथे २०१७ पूर्वी वर्षाला ५, ७, १० दंगली होत होत्या. गेल्या आठ वर्षांत बरेलीमध्ये एकही दंगल झाली नाही. आता बरेली चांगली झाली आहे. आता बरेलीमध्ये दंगल होत नाही. सर्व दंगलखोर उंदरांसारखी कुरकुर करतात, पण बाहेर येण्याची हिंमत करत नाहीत. दंगल केली, तर काय परिणाम होतील? हे त्यांना माहिती आहे. आपल्या बाप-दाद्यांनी जे काही कमावले असेल, ते सरकार एका झटक्यात जप्त करून गरिबांमध्ये वाटून देईल.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी येथे कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन केले. ते म्हणाले, "आता बरेली विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे. पायाभूत सुविधांचे नवे मॉडेल देत आहे. गेल्या सरकारांनी आमच्या नाथ नगरीची ओळख झुमक्याशी जोडली होती. आम्ही बरेलीला नाथ कॉरिडॉर देऊन, नाथ नगरी म्हणून ओळख देण्याचे काम केले आहे. आज बरेलीमध्ये गुंतवणूक येत आहे. येथे उद्योग उभारले जात आहेत.

यावेळी, समाजवादी पक्षाच्या प्रमुखांच्या 'गोवंशापासून दुर्गंधी येते' या विधानाचाही योगी आदित्यनाथ यांनी  समाचार घेतला. ते म्हणाले, "समाजवादी पक्षाने निराधार गोवंश दिले. गायी बेवारस सोडल्या. सपा प्रमुख म्हणतात की गोवंशापासून दुर्गंधी येते. हेच त्यांचे वास्तव आहे. ते गायी कसायांना देत होते. जेव्हा आम्ही कसायांना नरकाच्या प्रवासावर पाठवले, तेव्हा यांना त्रास झाला. त्याचे सर्व कसाई मित्र नरकात गेले आहेत, ही त्यांची समस्या आहे.

जेव्हा गायींचे संरक्षण करणे आव्हान होते, तेव्हा येथील भूमीपुत्र आमला येथील आमदाराने निराधार गायींसाठी ७७०० हून अधिक निवारागृहे सुरू केली. राज्य सरकार स्वतः तेथील १४ लाखांहून अधिक गुरांची काळजी घेत आहे. आम्ही काही शेतकऱ्यांना दिल्या आहेत. आपणही पाळा. एका गायीसाठी सरकार १५०० रुपये देते. गायींची सेवा करून पुण्य मिळवा आणि सरकारी अनुदानही मिळवा. 
 

 

Web Title: UP They grumble like mice, they but don't dare; there has been no riot for 8 years CM Yogi's attack in bareilly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.