शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

समाजवादी पार्टी आणि लोहशाही हे नदीचे दोन किनारे, योगी आदित्यनाथ यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 19:18 IST

Yogi Adityanath News: समाजवादी पार्टी आणि लोहशाही हे नदीचे दोन किनारे आहेत, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आधित्यनाथ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समाजवादी पार्टी आणि विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडेय यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

समाजवादी पार्टी आणि लोहशाही हे नदीचे दोन किनारे आहेत, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आधित्यनाथ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समाजवादी पार्टी आणि विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडेय यांच्यावर जोरदार टीका केली आहे. समाजवादी पार्टीच्या सत्ताकाळात व्यापाऱ्यांवर झालेला अन्याय, गुंडा टॅक्स आदींची आठवण काढत योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचा लोकशाहीवर असलेला विश्वाह हा केवळ देखावा आहे, असा टोला लगावला. तसेच संभल, बहराइच आणि गोरखपूरमधील सपाच्या नकारात्मक राजकारणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडेय यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना योदी आदित्यनाथ त्यांचा उल्लेख एक ज्येष्ठ नेते असा  करत म्हणाले की, काही लोक त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडत आहेत. माता प्रसाद पांडेय जी तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्हाला अनावश्यकरीत्या मोहरा बनवून काही लोक तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधत आहेत. तुम्ही असं होऊ देता कामा नये, असे आवाहन केले.

गोरखपूर वारसा कॉरिडॉरच्या मुद्यावरून समाजवादी पार्टी नकारात्मक आणि विकासविरोधी राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच गोरखपूर वारसा कॉरिडॉरबाबत सविस्तर माहिती दिली. सपाच्या कार्यकाळात या भागामध्ये कुठलंही विकासकाम झाला नाही, असा आरोपही त्यांनी केला. समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात व्यापाऱ्यांना भीती आणि गुंडा टॅक्सचा सामना करावा लागत असे, त्यामुळे गोरखपूरमधील व्यापाऱ्यांनी माता प्रसाद पांडेय यांच्या दौऱ्याला विरोध केला होता, अशा टोलाही योगी आदित्यनाथ यांनी लगावला. 

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी  समाजवादी पक्षाचं सरकार सत्तेत असतताना झालेल्या नग्न तांडवाचाही उल्लेख केला. तसेच सध्याचं सरकार तिथे शुद्धिकरणाचं अभियान राबवत असल्याचे सांगितले. सपाने संभलमध्ये जी नकारात्मक पसरवली होती तिच्यामध्ये आता आम्ही सुधारणा करत आहोत. मात्र समाजवादी पक्ष आपल्या जुन्या खोडी न सोडता विकासामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही योगींनी केला.

संभल असो, बहराइच असो वा गोरखपूर असो सपा प्रत्येक ठिकाणी नकारात्मक राजकारण करते. भाजपा आणि एनडीएचं सरकार विकास करू इच्छित आहे मात्र सपाला हे सहन होत नाही आहे, असा टोलाही योगींनी लगावला.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी