शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 22:31 IST

Yogi Adityanath Latest Speech: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसला लक्ष्य केले. या पक्षांनी समृद्ध उत्तर प्रदेशचे कुपोषण करून ओळख मिटवली, अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला. 

CM Yogi Adityanath latest News: 'उत्तर प्रदेश कुपोषित आणि आजारी राज्य नव्हते. विश्वासघातकी राजकीय पक्षांनी या राज्याला आजारी बनवले. भ्रष्टाचार आणि भेदभावाच्या राजकारणाने या समृद्ध प्रदेशाला मागासलेपणाच्या गर्तेत ढकलले. ओळख मिटवली. २०१७ पूर्वी नियुक्त्या करताना भेदभाव केला जात होता. पात्र असलेले तरुण अन्याय आणि भ्रष्टाचाराचे बळी ठरत होते', अशा शब्दात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर घणाघात केला. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लोकभवन सभागृहात उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगातर्फे निवडण्यात आलेल्या २,४२५ मुख्य सेविका आणि १३ फार्मासिस्ट उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. 

उत्तर प्रदेशचे देशाच्या विकासात १४ योगदान होते, पण... 

मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, 'देशाच्या विकासात उत्तर प्रदेशचे मोठे योगदान होते. १९४७ नंतर १९६० पर्यंत उत्तर प्रदेश देशातील अग्रगणी राज्य होते. देशाच्या विकासात १४ टक्के योगदान होते. १९६० नंतर उत्तर प्रदेशची घसरण सुरू झाली. १९९० नंतर घसरगुंडीच झाली. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशचे देशाच्या विकासातील योगदान अवघ्या ८ टक्क्यांवर आले होते.'

'कृषि उत्पादन, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीमध्ये उत्तर प्रदेश कायम पिछाडीवर पडत गेला. उत्तर प्रदेशातील तरुण मग बाहेरच्या राज्यात जात होते. तिथेही त्यांच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. हे सगळं घराणेशाही आणि दंगलीच्या राजकारणामुळे घडत होतं. या राजकारणाने उत्तर प्रदेशला लुटीचा अड्डाच बनवलं होतं', अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस, समाजवादी पक्षावर केली. 

विरोधकांना नैराश्याने ग्रासले, मुद्दे राहिले नाहीत

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, 'विरोधकांकडे आता कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत. त्यांना नैराश्य आले आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींतून कार्यालये हलवणे आणि विद्यार्थी आणि शिक्षकांची कमी झालेली संख्या वाढवणे हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग आहे.'

'एक मोडकळीस आलेली इमारत कोसळून मुले मेली. पण, विरोधक दिशाभूल करत आहे. सरकार प्री-प्रायमरी आणि ५००० अंगणवाड्याही चालवत आहे. मुलांचं चांगलं पोषण व्हावं म्हणून पोषण मिशनच्या अंतर्गत ३ ते ६ वयोगटातील मुलाचे मानसिक आणि आरोग्य चांगलं राहावं म्हणून सरकार प्रयत्न करत आहे', असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी