शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 22:31 IST

Yogi Adityanath Latest Speech: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसला लक्ष्य केले. या पक्षांनी समृद्ध उत्तर प्रदेशचे कुपोषण करून ओळख मिटवली, अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला. 

CM Yogi Adityanath latest News: 'उत्तर प्रदेश कुपोषित आणि आजारी राज्य नव्हते. विश्वासघातकी राजकीय पक्षांनी या राज्याला आजारी बनवले. भ्रष्टाचार आणि भेदभावाच्या राजकारणाने या समृद्ध प्रदेशाला मागासलेपणाच्या गर्तेत ढकलले. ओळख मिटवली. २०१७ पूर्वी नियुक्त्या करताना भेदभाव केला जात होता. पात्र असलेले तरुण अन्याय आणि भ्रष्टाचाराचे बळी ठरत होते', अशा शब्दात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर घणाघात केला. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लोकभवन सभागृहात उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगातर्फे निवडण्यात आलेल्या २,४२५ मुख्य सेविका आणि १३ फार्मासिस्ट उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. 

उत्तर प्रदेशचे देशाच्या विकासात १४ योगदान होते, पण... 

मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, 'देशाच्या विकासात उत्तर प्रदेशचे मोठे योगदान होते. १९४७ नंतर १९६० पर्यंत उत्तर प्रदेश देशातील अग्रगणी राज्य होते. देशाच्या विकासात १४ टक्के योगदान होते. १९६० नंतर उत्तर प्रदेशची घसरण सुरू झाली. १९९० नंतर घसरगुंडीच झाली. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशचे देशाच्या विकासातील योगदान अवघ्या ८ टक्क्यांवर आले होते.'

'कृषि उत्पादन, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीमध्ये उत्तर प्रदेश कायम पिछाडीवर पडत गेला. उत्तर प्रदेशातील तरुण मग बाहेरच्या राज्यात जात होते. तिथेही त्यांच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. हे सगळं घराणेशाही आणि दंगलीच्या राजकारणामुळे घडत होतं. या राजकारणाने उत्तर प्रदेशला लुटीचा अड्डाच बनवलं होतं', अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस, समाजवादी पक्षावर केली. 

विरोधकांना नैराश्याने ग्रासले, मुद्दे राहिले नाहीत

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, 'विरोधकांकडे आता कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत. त्यांना नैराश्य आले आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींतून कार्यालये हलवणे आणि विद्यार्थी आणि शिक्षकांची कमी झालेली संख्या वाढवणे हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग आहे.'

'एक मोडकळीस आलेली इमारत कोसळून मुले मेली. पण, विरोधक दिशाभूल करत आहे. सरकार प्री-प्रायमरी आणि ५००० अंगणवाड्याही चालवत आहे. मुलांचं चांगलं पोषण व्हावं म्हणून पोषण मिशनच्या अंतर्गत ३ ते ६ वयोगटातील मुलाचे मानसिक आणि आरोग्य चांगलं राहावं म्हणून सरकार प्रयत्न करत आहे', असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी