शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

बादशाह अकबरने पुत्र सलीमला 'या' किल्ल्यात ठेवलं होतं नजरकैदेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 16:11 IST

मुघल बादशाह अकबरने मुलगा सलीम याला ज्या किल्ल्यात नजरकैद केलं होतं तो किल्ला अलवरमधील बाल किल्ला आहे.

मुघल बादशाह अकबरने मुलगा सलीम याला ज्या किल्ल्यात नजरकैद केलं होतं तो किल्ला अलवरमधील बाल किल्ला आहे. हा किल्ला अलवर या नावानेही ओळखला जातो. अरावलीच्या डोंगरामध्ये असलेल्या या किल्ल्याची भिंत संपूर्ण डोंगरावर पसरलेली आहे. १ हजार फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याचं निर्माण हसन खान मेवाती यांनी केलं होती. हा किल्ला अलवरमधील सर्वात जुन्या इमारतींपैकी एक आहे. 

किल्ल्याची बनावट

हा किल्ला त्याच्या बनावटीसाठी खासकरून प्रसिद्ध आहे. ५ किलोमीटर लांब आणि १.५ किलोमीटर रूंग बाल किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ५ दरवाजे आहेत. या किल्ल्यात जलमहल, निकुंभ महल, सलीम सागर, सूरज कुंड आणि काही मंदिरांचा पडलेला पाहता येऊ शकतो. किल्ल्याच्या आत जवळपास ३४० मीटर उंचीवर १५ मोठे आणि ५१ छोटे टॉवर लावण्यात आले आहेत. किल्ल्यात ८ मोठे बुर्ज आणि तोफांसाठी ४४६ छिद्रे आहेत. तसेच या किल्ल्यात राम मंदिर, हनुमानाचं मंदिर आहे. 

बाल किल्ल्याचा इतिहास

१५५१ मध्ये हसन खान द्वारे तयार करण्यात आलेल्या या किल्ल्याची शान आजही तशीच कायम आहे. या किल्ल्यावर मुघलांसोबतच मराठा आणि जाट शासकांनीही शासन केलं होतं. शेवटी १७७५ मध्ये कच्छवाहा राजपूत प्रताप सिंह यांना किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला होता. 

किल्ल्यात फिरण्याची वेळ

किल्ल्याच्या सुंदरतेचा आनंद तुम्ही सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजेपर्यंत घेऊ शकता. तसा तर अलवरमध्ये फिरण्यासाठी सर्वात चांगलं वातावरण ऑक्टोबर ते मार्च महिन्यात असतो. पावसाळ्यातही इथे फिरण्याची एक वेगळी मजा असते. 

कसे पोहोचाल?

अलवरला पोहोचण्यासाठी नवी दिल्लीचं इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्वात जवळ आहे. जयपूर ते अलवर अंतर सामान्यपणे १६२ किमी आहे. जयपूर आणि दिल्ली सोबतच उत्तर भारत आणि राजस्थानच्या वेगवेगळ्या शहरातून अलवरसाठी रेल्वेही आहेत. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सRajasthanराजस्थान