,केंद्रात व राज्यात भाजपची पाच वर्षे सत्ता होती. त्यावेळी हा तपास एनआयएकडे का दिला नाही. पाच वर्षे हे काय झोपले होते का? अशा शब्दात बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली. ...
विद्यावेतन मिळत नसल्यामुळे लोकसेवा आयोगाची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी नुकतेच दिल्ली येथे जंतर- मंतरवर आंदोलन केले होते. तसेच सारथीच्या माध्यमातून दिले जाणारे थकित विद्यावेतन तात्काळ मिळावे,अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्रीपदाची जबाबदारी ...
वृक्ष लागवड भाजपा-शिवसेना-रिपाई महायुतीच्या सरकारचा हा एक महत्वाकांक्षी उपक्रम होता. जगामध्ये पर्यावरणीय बदल, ग्लोबल वार्मिंग याबद्दल चिंता केली जाते ...
चंद्रपूर शहर महापालिकेने महापौर चषक २०२० चे आयोजन केले आहे. शनिवारी या चषकाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत प्रोटोकाल पाळण्यात आला नसल्याचा आरोप होत आहे. उद्घाटनाचा मान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा असताना त्यांना देण्यात आले ...
चांदा क्लब मैदानावर शुक्रवारपासून पाच दिवस जिल्हास्तरीय सरस महोत्सवाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर, उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील पाच दिवस महिला ...
कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वाजीत कदम यांच्यावर सांगली, सोलापूरच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ...
यावेळी विभागातील पांदण रस्त्यांच्या निर्मिती आणि दुरुस्तीच्या संदर्भातील प्रश्न पुढे आला असता निधीअभावी ही कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश त्यांनी दिले. या विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीत जाण्यासाठी रस्त्यांची मागणी केली हो ...