वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
Solapur Lok sabha: सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या दिवशीच गायकवाड यांनी माघार घेतल्याने वंचितमध्ये खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी वंचितने उमेदवारी दिली परंतु कार्यकर्तेच सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. ...
वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा न देता महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ...
मावळ लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नसताना डॉ. अक्षय गंगाराम माने आणि सचिन महिपती सोनवणे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज नेला होता. ...