घरातील दहा माणसं झोपेत असतानाच बुधवारी पहाटे घराने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे समजताच कुटुंबातील सदस्य सुरक्षित ठिकाणी गेले; परंतु संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. ही घटना जावळी तालुक्यातील गांजे येथे घडली. ...
निसराळे येथे सावडण्याच्या विधी कार्यक्रमात जेवण केल्यानंतर अठरा महिलांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बुधवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. ...
सातारा पालिकेने शहरात नवीन एलईडी पथदिवे जरूर बसवावेत; परंतु यापूर्वी बसविण्यात आलेल्या नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करून त्यांचा उजेड आधी पाडावा, अशी मागणी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी केली. ...
केंद्र शासनाच्या बाराव्या सीआरएम अंतर्गत आरोग्य सेवेच्या मूल्यांकनासाठी जावळी तालुक्यातील करहर व हातगेघर या गावांना केंद्रीय पथकाने भेट देऊन लाभार्थी व रुग्णांशी संवाद साधत माहिती घेतली. ...
सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीचा चांगलाच परिणाम झाला आहे. ८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या मोहिमेत तब्बल ४० लाख १३ हजार ९०३ रुपयांची वसुली झाली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण साताऱ्यात गेले. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ येथूनच झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये पहिलीमध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. ...
जन्मत:च अपंग असलेल्या पाल्याच्या काळजीसाठी शासनाने डे केअर सेंटर सुरू केलं; पण भाकरीच्या चंद्रासाठी बाहेर पडणाऱ्या पालकांना आपल्या विशेष पाल्यासाठी द्यायला वेळ नाही. ...