छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी 36 हजार 933 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यातील तब्बल 1 हजार 674 अर्ज तालुका स्तरीय छाननी समितीने अपात्र ठरविले आहेत. ...
देवठाणा येथे गायीच्या कारवडीवर सोमवारी रात्री हिंस्त्र पशूने हल्ला केला होता. या पशुचा शोध घेतला असता वन अधिकाऱ्यांना अवघ्या २० फुटांवरून बिबट्या नजरेस पडला. यामुळे हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे निष्पन्न झाले. ...
शेती आखाड्यावर असलेल्या पाळीव जनावरांवर हिंस्त्र पशूंच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पिंपळगाव, देऊळगाव या नदीकाठच्या गावानंतर आता देवठाणा येथेही असा हल्ला झाला. ...
शेतीमधील सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून एका ३३ वर्षीय शेतकर्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे गुरुवारी (दि.1 ) घडली. ...
नियमबाह्य पद्धतीने साठवणूक केलेल्या वाळू साठ्याची महसूल प्रशासनाने जप्ती करून कारवाई केली़ मात्र जप्त केलेल्या २२ वाळू साठ्यातील तब्बल २ हजार ब्रास वाळू चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे़ ...
पूर्णा येथे नव्याने रुजू झालेले तालुका कृषी अधिकारी यांच्या गाडीला धडक देत त्यांना भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी झिरो फाटा येथे घडली. ...
२०१७-१८ च्या उन्हाळी हंगामासाठी कृषी विभागाने ५ हजार ४३० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. २२ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ३ हजार २७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. ...