राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Loksabha Election 2024: काँग्रेस आणि त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता शरद पवारांच्या पक्षानेही त्यांची यादी जाहीर करण्याची तयारी केली आहे ...
खारेगाव येथील खारलॅन्ड वरील मैदानाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टाळे ठोकण्यात आल्यानंतर त्याचा जाब आव्हांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विचारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या मैदानाला टाळे ठोकण्यास सांगितल्याचेही ते म्हणाले. ...
Congress NCP Upset on Uddhav Thackeray: मविआत ठाकरे गटाची पहिली यादी येताच नाराजीनाट्य उफाळून आले आहे. मुंबईतील ६ पैकी ४ जागांवर ठाकरेंनी उमेदवार घोषित केलेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे. ...