राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Shiv Sena Shinde Group Minister Uday Samant News: नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असल्याचे सांगितले जात आहे. ...
बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड प्रकरण आणि गुन्हेगारीचा मुद्दा गाजत असतानाच पुण्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारला सवाल केला आहे. ...