राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Chhagan Bhujbal News: त्यावेळी एक भूमिका आणि यावेळी वेगळी भूमिका असे चालायचे नाही. जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते, तेव्हा शरद पवार का गैरहजार राहतात, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. ...
Goa BJP State President Damu Naik Replied Maharashtra DCM Ajit Pawar: कोण पर्रीकर? या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रश्नाचे पडसाद गोव्यात उमटले आहेत. गोव्यातील भाजपा नेत्यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर देत टीका केली आहे. ...