Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: खासदार, आमदार, माजी महापौर, नगरसेवकांची फौज असताना आदित्य ठाकरेंची वरळी शिवसैनिकांची शपथपत्रे गोळा करण्यात मागे असल्याने पक्षनेतृत्वातून संताप व्यक्त होत आहे. ...
Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नसून, मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
Maharashtra Political Crisis: विधान परिषदेत शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे असून, विरोधी पक्षनेता म्हणून शिवसेनेचेच अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...