Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
MLA Disqualification Hearing: ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज देतोय. अशाने सुनावणी लांबत आहे. येथे एक भूमिका अन् सुप्रीम कोर्टात वेगळी भूमिका का घेता, अशी विचारणा राहुल नार्वेकरांनी केली. ...
Rahul Narvekar Replied Sanjay Raut: संजय राऊतांसारख्या व्यक्तींच्या प्रश्नाला किंवा आरोपांना उत्तर देऊन स्वतःची गरिमा कमी करू इच्छित नाही, असे प्रत्युत्तर राहुल नार्वेकरांनी दिले. ...