देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
BMC Mumbai Municipal Election Results 2026 : राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यामधील ४६ जागांचे कल आता समोर आले आहेत. ...
Mumbai Municipal Election 2026: महापालिकांच्या निवडणुकीचे मतदान होत असताना अनेक ठिकाणी गोंधळ झाला. मतदारांची नावेच मतदार नसल्याचे, शाई पुसली जात असल्याचे, तसेच अनेक ठिकाणी मतदान ईव्हीएम बंद पडल्याचे प्रकार घडले. त्यावरून विरोधकांनी आयोगाला घेरले, तर ...