देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Municipal Elections 2025: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढाव्यात आणि परिस्थितीनुसार निवडणुकीनंतर आघाडीबाबत विचार करावा, असा पक्षातील नेत्यांचे सूर असल्याचे म्हटले जात आहे. ...
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील वाळवा तालुका काँग्रेस कमिटीची मालकी असणाऱ्या इमारतीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बेकायदेशीरपणे ताबा ठेवण्यात आल्याची ... ...