देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेसचे टेन्शन वाढतच आहे. अर्ज माघारीचा आज, सोमवारी शेवटचा दिवस ... ...
Maharashtra Assembly Election 2024: भारतीय जनता पक्ष व काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष विधानसभा निवडणुकीत तब्बल ७४ मतदारसंघांमध्ये आमने-सामने लढत आहेत. याचा अर्थ राज्यातील एकूण लढतींपैकी २५ टक्के लढती या दोन परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये होतील. ...
Rahul Gandhi: आज देशातील मुख्य लढा संविधानाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आहे. देशाची राज्यघटना द्वेषाने नाही, तर विनयशीलता आणि प्रेमाने लिहिली गेली आहे, असे उद्गार काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी काढले. ...
बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरची मुदत आहे. ही मुदत उद्यावर येऊन ठेपली तरी बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांना यश आलेले नाहीय. ...