देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
नेते आपल्या लहान मुलांनाही घेऊन विमानतळावर येतील इतकी मोकळीक त्यावेळी होती, नेतेही या मुलांबरोबर बोलत, त्यांची विचारपूस करत. कसलीही सुरक्षा व्यवस्था त्याआड येत नसे ...
रामटेक मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे उघड झाले आहे. याठिकाणी ठाकरेंच्या उमेदवाराला साथ न देता काँग्रेसने बंडखोर उमेदवारामागे ताकद उभी केली आहे. ...
रामटेक मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. त्यात सुनील केदार यांना ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांनी गद्दार आणि विश्वासघातकी म्हटलं आहे. ...