देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
रमेश चेन्नीथला यांनी आमदार व पराभूत उमेदवारांशी 'वन टू वन' चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष बदलवायचा की नाही, नवा चेहरा कोण असू शकतो, अशीही विचारणा करण्यात आली. ...
Amit Shah Ambedkar Remark row: यावरून आता संसदेत राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. जयराम रमेश यांनी अमित शाह यांचा संसदेतील या भाषणावेळचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...
Amit Shah News: काँग्रेसने नेहमी घराणेशाही, लांगुलचालन आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले. काँग्रेसने या तीन गोष्टी सोडल्या तर जनता त्यांना विजयी करेल, असा टोला अमित शाह यांनी लगावला. ...
Congress Nana Patole: नाना पटोले यांनी आजही प्रदेशाध्यक्षपदाबाबत भाष्य केलं. काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ...