देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरबाबत सीडीएस अनिल चौहान यांनी केलेलं विधान अतिशय गंभीर असून, त्यावर राजकीय चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. ...
Harshwardhan Sapkal: राज्यात भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय असून, सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली. ...
Congress News: हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केला होता. त्यावरून आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
Revanth Reddy And Narendra Modi : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आणि पाकिस्तानसोबतच्या संघर्षाचा सामना करण्यामध्ये त्यांच्याकडे धाडस, रणनीती आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचं म्हटलं ...
Operation Sindoor: जयराम रमेश यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना सरकारने विविध देशांत पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातील खासदारांची तुलना दहशतवाद्यांसोबत केली. त्यावरून भाजपाने रमेश यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...