देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Telangana News: मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगाणामध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने रमजानच्या महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांना एक तास लवकर ऑफिस सोडण्याची सूट दिली आहे. ही सवलत २ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत लागू राहणार आहे. ...
भाजपने २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ४,३४०.४७३ कोटी रुपये उत्पन्न जाहीर केले; परंतु त्यापैकी फक्त ५०.९६ टक्के म्हणजे २,२११.६९ कोटी रुपये खर्च केले आहेत. ...
Sam Pitroda News: जगाने आता परस्पर संघर्ष सोडून सहकार्याच्या मार्गावर पुढे गेलं पाहिजे. आपलं धोरण हे सुरुवातीपासून संघर्षाचं राहिलं आहे. या भूमिकेमुळे देशात पाठिंबा तर मिळतो. मात्र त्यामुळे द्विराष्ट्रीय संबंधात कटूता निर्माण होते. आपण आपली मानसिकता ...