देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Amit Shah News: राज्यसभेत ‘वंदे मातरम’ या गीतावर राज्यसभेमध्ये चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वरच्या सभागृहात चर्चेला सुरुवात करताना प्रियंका गांधींसह विरोधी पक्षातील इतर नेत्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ...
Sonia Gandhi News: सोनिया गांधी यांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारण्यापूर्वीच त्या भारतातील मतदार बनल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रकरणी दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने सोनिया गांधी यांना नोटिस बजावली आहे. ...
Madhya Pradesh News: भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमधील नगरविकास आणि आवास राज्यमंत्री प्रतिमा बागरी यांचं कुटुंब वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. पोलिसांनी प्रतिमा बागरी यांच्या भाओजींना गांजाच्या तस्करी प्रकरणी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. ...