देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
PMC Election 2026 भाजपचे २ उमेदवार बिनविरोध आले तेथे वंचितकडे उमेदवार होता. परंतु काँग्रेस आणि उद्धवसेना यांनी या ठिकाणी उमेदवार न देता भाजपला मदत केली ...
Nagpur : कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर भूमिका मांडली. कुणी कितीही शिव्या दिल्या तरी माझ्यावर परिणाम होत नाही. मला विष प्यायची सवय आहे. ...
विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्याशिवाय राहणार नाही, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते. या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातुरमधील सभेत भूमिका मांडली. ...
PCMC Election 2026 पिंपरी चिंचवडमधील २०१२ च्या निवडणुकीमध्ये खंबीर नेतृत्वाशिवाय काँग्रेस भरकटली. जागा कमी झाल्या, तर शिवसेना आणि भाजपला उभारी मिळाली. ...