Aurangabad rename Latest NewsFOLLOW
Aurangabad rename, Latest Marathi News
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा मुद्दा चर्चेत आला आहे. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. त्यामुळे शिवसेनेसाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा आहे, पण महाविकास आघाडीतील काँग्रेसचा त्याला पूर्णपणे विरोध आहे. हे ओळखून, भाजपाने शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही खेळी केल्याचं बोललं जातंय. अशावेळी, भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी, औरंगाबाद विमानतळाच्या नाव बदलण्याबाबत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे.