शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

भिवंडीतील भुयारी गटर योजनेचा नियोजन शून्य कारभार, महिला आंदोलनाच्या पावित्र्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 10:54 PM

नळ कनेक्शन तोडल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण ; महिला आंदोलनाच्या पावित्र्यात  

ठळक मुद्देमागील पंधरा दिवसांपासून ठेकेदाराने हे तोडलेले नळ कनेक्शन पुन्हा जोडले नसल्याने येथील राहिवासींना ठेकेदाराच्या हलगर्जी कारभारामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. १९ ) भिवंडी महापालिकेची भुयारी गटर योजना नेहमीच चर्चेत येत असून या गटर योजनेच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे. या भुयारी गटर योजनेच्या ठेकेदाराने शहरात ठिकठिकाणी खोदकाम केल्याने शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची वाताहात झाली असून शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच आता शहरातील शांतीनगर भाजी मार्केट परिसरात भुयारी गटर योजनेचे काम करतांना करण्यात आलेल्या खोदकामाने येथील सुमारे ५० ते ६० परिवारांचे नळ कनेक्शन ठेकेदाराने तोडले आहे.

मागील पंधरा दिवसांपासून ठेकेदाराने हे तोडलेले नळ कनेक्शन पुन्हा जोडले नसल्याने येथील राहिवासींना ठेकेदाराच्या हलगर्जी कारभारामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच मागील चार दिवसांपासून तर येथील राहिवासींना तोडलेल्या नळ कनेक्शनमुळे पिण्याच्या पाण्याला मुकावे लागले असल्याने येथील नागरिक मनपासह भुयारी गटर योजनेच्या ठेकेदारावर कमालीचे नाराज झाले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून तोडलेल्या या नळ कनेक्शनकडे मनपा प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष जात नसल्याने येथील महिला वर्गाकडून मनपा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून येत्या दोन दिवसात येथील तोडलेले नळ कनेक्शन ठेकेदार अथवा मनपा प्रशासनाने जोडले नाही तर महापालिकेच्या मुख्यालयावर महिला व नागरिक हंडा मोर्चा काढतील असा इशारा येथील रहिवासी मुश्ताक शेख यांनी दिला आहे. 

विशेष म्हणजे गटर योजनेचे काम करतांना नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी व समस्या होणार नाहीत याची खबरदारी संबंधित ठेकेदाराने घेणे गरजेचे असल्याच्या लेखी सूचना मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी ठेकेदारांना वेळोवेळी देऊनही संबंधित ठेकेदार मनपा आयुक्तांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून शांतीनगर भाजी मार्केटपरिसरातील नागरिकांना अत्यावश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवत असल्याने मनपा आयुक्त या ठेकेदारांवर कारवाई करणार का याकडे शांतीनगर परिसरातील नावरीकांसह संपूर्ण शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी