शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कंत्राटदाराला निविदेसाठी तुम्हीच सुचवा; कोपर पुलाची निविदा प्रक्रिया रखडल्याने हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:27 IST

केडीएमसीचे रेल्वेला साकडे

कल्याण : डोंबिवलीतील कोपर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने मागवलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने या कामासाठी अनुभवी कंत्राटदार रेल्वेनेच सुचवावा. त्याला निविदा भरण्यास रेल्वेने सांगावे, अशी मागणी करणारे पत्र महापालिका प्रशासनाने मध्य रेल्वे प्रशासनाला पाठवले आहे. रेल्वेला पाठवलेल्या पत्रानुसार महापालिकेने काढलेल्या फेरनिविदेला प्रतिसाद मिळणार नाही, याचा अंदाज महापालिकेस आधीच आला असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबईतील पादचारी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने विविध पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. कोपर रेल्वे उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल मिळाल्याने रेल्वेकडून पूल बंद करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले होते. १२ सप्टेंबरला महापालिकेने कोपर पूल वाहतुकीसाठी बंद केला. सप्टेंबरमध्ये पूल बंद करण्यापूर्वीच मनसेने विरोध केला होता. पूल बांधण्यासाठी काय तजवीज केली आहे, त्याचा जाब विचारला होता. तेव्हा प्रशासनाने अनुचित घटना टाळण्यासाठी पूल वाहतुकीसाठी बंद केला.

१२ सप्टेंबरला पूल बंद केल्यावर प्रशासनाने पुलाच्या कामाचे डिझाइन तयार करून ते १७ ऑक्टोबरला पाठवले. त्यात एक महिना वाया केला. रेल्वेकडून त्याला मंजुरी मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींकडून आवाज उठवल्यानंतर डिझाइनला ८ नोव्हेंबरला मंजुरी मिळाली. त्यानंतर, पुलाच्या कामाचा खर्च कोणी उचलायचा व तो किती करायचा, हा मुद्दा उपस्थित झाला. ५० टक्के खर्चाबाबत रेल्वेने हात वर करत पुलाच्या आधी तेथे रेल्वे फाटक होते, असा पुरावा आणा, असे म्हटले होते. आमदार रवींद्र चव्हाण यांनी तो पुरावा रेल्वेला दिला. त्यापूर्वीच महापालिकेने नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊ न नऊ कोटी ६२ लाखांच्या खर्चास मंजुरी दिली. तसेच तातडीने निविदा काढण्याचे आदेश दिले. पालिकेने निविदा काढली. तिला प्रतिसाद मिळाला नाही.

पहिल्या निविदेला प्रतिसादच न मिळाल्याने या प्रक्रियेत वेळ वाया गेला. आता पुन्हा महापालिकेने या कामासाठी फेरनिविदा मागवली आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवून हा पूल बांधायचा आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे काम करण्यास कंत्राटदार पुढाकार घेत नाही. अशा स्वरूपाचे काम करणारे कंत्राटदार हे रेल्वेच्या सान्निध्यात असतात. रेल्वेनेच या कामासाठी एखादा कंत्राटदार सुचवून निविदा भरण्यासाठी प्रेरित करावे. तेव्हाच महापालिकेच्या फेरनिविदेस प्रतिसाद मिळू शकतो. अन्यथा, वेळ वाया जाण्याची दाट शक्यता आहे. १२ सप्टेंबरपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे. येत्या १२ फे ब्रुवारीस त्याला पाच महिने पूर्ण होतील. पाच महिन्यांत पुलाच्या निविदेची प्रक्रियाच पुढे सरकलेली नाही.

अनेक कामे निविदा प्रक्रियेत अडकली

निविदेला प्रतिसाद न मिळणे, याचा अनुभव महापालिकेला वारंवार येत आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन परिसराची निविदा मागविली. ही निविदा प्रस्तावित रकमेपेक्षा १०० कोटींनी जास्तीची आली आहे. तिचे मूल्यमापन करण्यासाठी आयआयटीकडे देण्यात आले आहे.

पंतप्रधान आवास योजनेच्या सर्वेक्षणासाठीही नऊ वेळा निविदा मागवून तिला पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही. आता त्यात म्हाडाकडून खुसपटे काढली जात आहे. कोपर पुलाच्या निविदा भरण्यातही राजकीय हस्तक्षेप झाल्याने पहिल्या फेरीस प्रतिसाद मिळाला नाही.आता पुन्हा तोच हस्तक्षेप होण्याची दाट शक्यता असल्याने महापालिकेने रेल्वेकडे साकडे घातले आहे. यात डोंबिवलीकर भरडले जात आहेत. याचा कुठेतरी राजकीय मंडळी, लोकप्रतिनिधींनी विचार करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणcentral railwayमध्य रेल्वेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारthaneठाणे