भिवंडीत महिलेची तिन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या
By नितीन पंडित | Updated: May 3, 2025 20:14 IST2025-05-03T20:14:11+5:302025-05-03T20:14:39+5:30
महिलेचा पती रात्रपाळी वरून कामावरून सकाळी नऊ वाजता घरी परतल्या नंतर सदरची घटना समोर आली आहे.

भिवंडीत महिलेची तिन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या
भिवंडी: शहरातील फेणे गाव येथे महिलेने आपल्या तीन मुलींसह स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेचा पती रात्रपाळी वरून कामावरून सकाळी नऊ वाजता घरी परतल्या नंतर सदरची घटना समोर आली आहे.
फेणे गाव येथील एका चाळीत लालजी बनवारीलाला भारती हा यंत्रमाग कामगार पत्नी पुनिता वय ३२ व मुली नंदिनी वय १२,नेहा वय ७ व अनु वय ४ वर्ष यांसोबत राहत होता.लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तो घरी परतला असता घरचा दरवाजा आतून बंद होता.अनेक वेळा दरवाजा वाजवून ही पत्नीने दरवाजा न उघडल्याने पती लालजी याने छोट्या खिडकी तून आत डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली.हतबल झालेल्या लालजीने टाहो फोडत दरवाजा उघडला असता आत मध्ये छताच्या लोखंडी अँगल वर गळफास घेऊन आत्महत्या केलेले मृतदेह आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले.घटनास्थळी आत्महत्या मी स्वतःच्या मर्जीने करीत असून आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिलेली चिट्ठी मिळाली असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. महिलेने मुलींसह आत्महत्या का व कोणत्या कारणांमुळे केली हे अजून स्पष्ट नसले तरी पोलिस अनेक बाजूने या आत्महत्येचा तपास करीत आहेत.