शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ठाणे महापालिकेचे दिवाळे थांबणार का?

By अजित मांडके | Updated: March 27, 2023 08:35 IST

ठाणेकरांना यंदा अर्थसंकल्पातून नवीन काही मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही.

णे महापालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकताच सादर केला. मागील वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पाच्या आकारमानात वाढ झाल्याने यंदाचा अर्थसंकल्प चार हजार ३७० कोटींचा असून, या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे काटकसरीला, आर्थिक शिस्तीला महत्त्व दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद ठाण्याकडे असल्याने अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानाला अधिक महत्त्व दिले जाणे स्वाभाविक आहे. ठाणे शहर मुंबईशी लोकसंख्येपासून विकासकामांबाबत स्पर्धा करते. मात्र, मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती तुलनेने खूप उत्तम आहे. त्याउलट ठाणे महापालिकेला उत्पन्न आणि खर्चाची सांगड घालताना तारेवरची कसरत करावी लागते. महापालिका निवडणूक कधी होणार हे स्पष्ट नसतानाही प्रशासनाने कोणत्याही प्रकारची करवाढ अथवा दरवाढ केलेली नाही. ठाणेकरांना खर्चीक स्वप्ने दाखविलेली नाहीत, हे अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे. 

ठाणेकरांना यंदा अर्थसंकल्पातून नवीन काही मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता, साफसफाई, झोपडपट्टी भागातील सुविधा, शिक्षण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खड्डेमुक्त ठाणे शहर या बाबींना अर्थसंकल्पात महत्त्व देण्यात आले आहे. मागील काही वर्षांत अर्थसंकल्पात दिसत असलेल्या खर्चीक प्रकल्पांना यंदाच्या अर्थसंकल्पातून थेट बाद करण्यात आले. स्व. आनंद दिघे यांच्या स्मारकासाठी यंदा कोणत्याही स्वरुपाची तरतूद केलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ डिसेंबर २०२२ रोजी ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ ही संकल्पना मांडली. त्या दिवसापासून किंबहुना आधीपासून शहरात सौंदर्यीकरणाच्या कामाबरोबर रस्ते दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आली. याशिवाय तलावांच्या सौंदर्यीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला.

शहर सौंदर्यीकरण असेल किंवा रस्ते दुरुस्ती मोहीम किंवा तलाव सौंदर्यीकरण या कामासाठी बहुतेक निधी शासनाकडूनच उपलब्ध झाला आहे. रस्त्यांसाठी ६०६ कोटी, शहर सौंदर्यीकरणासाठी १४० कोटींचा निधी शासनाकडून मंजूर झाला. महापालिकेला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. २७०० कोटींचे दायित्व हे २१०० कोटींपर्यंत आणण्यात पालिकेला यश आले आहे. परंतु, याच दायित्वाचा परिणाम अर्थसंकल्पावर झाला असल्याचे खुद्द आयुक्त बांगर यांनी मान्य केले आहे.  मागील मविआ सरकारमध्ये ठाण्याकडे नगरविकास मंत्रालय होते. आता तर मुख्यमंत्रिपद आहे. परंतु ठाणे महापालिका सरकारचा टेकू नसतानाही असेच अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प स्वबळावर राबवू शकेल, अशी आर्थिक घडी बसविणे ही गरज आहे.

झोपडपट्टीत वाचनालय

महापालिका हद्दीत झोपडपट्टी भागात वाचनालय ही संकल्पना उत्तम आहे. झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण हा निर्णय जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येणारा असला तरी महापालिकेवरील आर्थिक बोजा वाढविणारा आहे.महापालिकेच्या मराठी शाळांचा दर्जा सुधारण्याबरोबर पटसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढविण्याबरोबर महापालिका आता पहिल्यांदा सीबीएससी शाळा सुरू करणार आहे, ही निश्चित चांगली बाब म्हणावी लागेल.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे