शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

आदिवासीपाड्यांमध्ये आठवडाभर अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 3:06 AM

बदलापूरजवळील कोंडेश्वर परिसरात बेंडशीळ, चिकण्याचीवाडी, चिंचवली आणि चाफ्याचीवाडी या आदिवासी भागांना वादळी वाºयाचा जबरदस्त फटका बसला आहे.

अंबरनाथ : बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागाला जोरदार फटका बसला आहे. कोंडेश्वरजवळील आदिवासीपाड्यांमध्ये वादळी वाऱ्यामुळे काही घरे पडली असून, अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. येथील वीजपुरवठा ठप्प झाला असून तो सुरळीत होण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बदलापूरजवळील कोंडेश्वर परिसरात बेंडशीळ, चिकण्याचीवाडी, चिंचवली आणि चाफ्याचीवाडी या आदिवासी भागांना वादळी वाºयाचा जबरदस्त फटका बसला आहे. बुधवार सायंकाळी ६ नंतर या भागात सोसाट्याच्या वाºयासह पाऊस झाल्याने त्यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. काही आदिवासी बांधवांची घरे पूर्ण जमीनदोस्त झाली असून, अनेक घरांचे पत्रेही उडाले आहेत. या भागातील अनेक मोठे वृक्षही उन्मळून पडले आहेत. मोठे विजेचे खांबही पावसाच्या तडाख्यात सापडले. ग्रामीण भागातील नागरिकांनी एकत्र येत रस्त्यावर पडलेले वृक्ष तोडून बाजूला काढले. गुरुवारी दिवसभर ग्रामीण भागातील नागरिकांनी श्रमदानातून हे काम केले. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने या भागाचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब लागणार असल्याने या भागातील नागरिकांना अंधारातच राहावे लागणार आहे. चिंचवली परिसरामध्ये १५ ते २० घरांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे. तर, चाफ्याचीवाडी या आदिवासीपाड्यात ३५ ते ४० घरांना पावसाचा फटका बसला आहे. नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार किसन कथोरे आणि तहसीलदार जयराज देशमुख घटनास्थळी गेले होते. त्यांनी ग्रामस्थांबरोबर चर्चा केली.अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात ज्या ग्रामस्थांचे वादळीवाºयामुळे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत. तसेच सरकारकडून त्यांना लागलीच मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.- किसन कथोरे, आमदार

टॅग्स :thaneठाणेVasai Virarवसई विरार