शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
2
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
3
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
4
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
5
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
6
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
7
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
8
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
9
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
10
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
11
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
12
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
13
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
14
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
15
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
16
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
17
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
18
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
19
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मे मध्ये तोडणार उद्योगांचे पाणी!

By admin | Updated: March 5, 2016 01:34 IST

पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी लगेचच कारखान्यांचे पाणी तोडण्याचे आदेश एमआयडीसीला नाहीत. मात्र मे महिन्याच्या मध्यापर्यंत टंचाई तीव्र झाली

सुरेश लोखंडे,  ठाणे
पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी लगेचच कारखान्यांचे पाणी तोडण्याचे आदेश एमआयडीसीला नाहीत. मात्र मे महिन्याच्या मध्यापर्यंत टंचाई तीव्र झाली, तर मात्र उद्योगांचे पाणी टप्प्याटप्प्याने तोडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र त्याबाबतचा निर्णय जिल्ह्याच्या पाण्याचे नियोजन करण्याबाबत लवकरच होणाऱ्या पुढील बैठकीत घेतला जाणार आहे.
सध्या राज्याचे मंत्रिमंडळ टंचाईग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. ते दौरे आटोपले की ठाण्याची बैठक होईल, असा अंदाज आहे. त्या बैठकीत प्रत्येक शहराचा नवा कोटा ठरवण्यात येणार आहे. तोवर लघू पाटबंधारे खात्याने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार प्रत्येकाला पाणी उचलावे लागणार आहे. सध्या पाणीटंचाई ४५ टक्क्यांवर गेलेली असली तरी प्रत्यक्षात ती ६५ टक्के करण्याचे नियोजन आहे. सध्या पाणीबंद आणि इतर दिवशी कमी दाबाने पाणी पुरवत साधारण ५० टक्के कपात सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
दरम्यान, पाण्याचा ठरवून दिलेला कोटा आणि प्रत्यक्षात जादा उचललेले पाणी याबाबतची माहिती उघड झाल्याने लघू पाटबंधारे विभाग कोणत्याही क्षणी पाणीबंद करण्याची (यंत्रणा सील करण्याची) कारवाई करू शकेल, या भीतीपोटी एमआयडीसीचे अधिकारी त्यांना ठरवून दिलेली कपात मान्य करण्यास तयार झाल्याचे कळते.
उपलब्ध पाणी साठ्यातून १५ जुलैपर्यंत पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या लघू पाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार आठवड्यातून ४० टक्के पाणी कपातीसह रोजच्या पाणी पुरवठ्यातही २५ टक्के कपातीचे धोरण आम्ही अंमलात आणल्याचे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश लोणकर यांनी सांगितले.
आठवड्यातून ५० टक्के पाणी कपात लागू करण्याचे एमआयडीसीने मान्य केले आहे. सध्या कारखान्यांचे पाणी तोडण्याचे आदेश आम्हाला नाहीत. पण पिण्याच्या पाण्याला प्राधान्यक्रम देऊन कारखान्यांचे पाणी देखील आदेश येताच बंद करण्यास एमआयडीसीने सहमती दर्शवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘एमआयडीसीनेच चोरले पाणी?’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर त्यांनी कपातीचे सूत्र स्वीकारल्याची भूमिका मांडली.
उद्योगांना पुरवल्या जाणाऱ्या पाण्यातील ८० टक्के हे कारखान्यांतील कामगारांना पिण्यासाठी आणि २० टक्के कारखान्यांसाठी दिले जाते. त्यातील पिण्याच्या पाण्यात कपात करून आधी मार्ग काढला जाईल. नंतर गरजेनुसार उद्योगांचे पाणी तोडले जाईल, असा तोडगाही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांपुढे आहे.