शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पाणीकपात जाणार ३० टक्क्यांवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:32 IST

- मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील वाढती लोकसंख्या, अतिरिक्त पाणी उचलण्याची काही महापालिकांची चूक, नव्या धरणांचा अभाव यामुळे दिवाळीच्या ...

- मुरलीधर भवार

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील वाढती लोकसंख्या, अतिरिक्त पाणी उचलण्याची काही महापालिकांची चूक, नव्या धरणांचा अभाव यामुळे दिवाळीच्या आधीच २२ टक्के पाणीकपात लागू झाली आहे. गेली दहा वर्षे सातत्याने येथील नागरिकांना कपातीचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला सात टक्के इतकी मर्यादित असलेली कपात गेली दोन वर्षे १४ टक्क्यांवर गेली होती. यंदात तर सुरुवातीलाच २२ टक्के कपात लागू असल्याने मे महिन्यात पाणीकपात ३० टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात ९७ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, लोकसंख्येला उपलब्ध पाणीसाठा पुरवण्याचे नियोजन करण्यासाठी ही कपात लागू केली असल्याचे लघुपाटबंधारे विभागाने जाहीर केले आहे. मात्र, दरवर्षी वाढती पाणीटंचाई हा भविष्याच्या दृष्टीने धोका आहे.उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. या नदीच्या पात्रातून कल्याण, डोंबिवली, एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्टेम पाणीपुरवठा यंत्रणा हे पाणी उचलतात. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. उल्हास नदीपात्रात आंध्र धरणातून आणि बारवी धरणातून पाणी साडले जाते. विविध स्थानिक स्वराज्य संस्था या उल्हास नदीपात्रातून पाणी उचलतात. नदीपात्रातून १२०० दशलक्ष लीटरपेक्षा जास्त पाणी उचलले जात आहे. आंध्र धरणातून वीज तयार केली जाते. मागच्या वर्षी बारवी धरणात १०२ टक्के पाणीसाठा होता. आजमितीस बारवी धरणात ९७ टक्के पाणीसाठा आहे. १५ जुलै २०१९ पर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने पाणीकपात लागू केली आहे. १० आॅक्टोबर रोजी झालेल्या पाणीसाठा आढावा बैठकीनंतर २२ टक्के कपात लागू केली गेली. आठवड्यातून एक दिवस २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. २००७ पासून म्हणजे १० वर्षे पाणीकपात सुरू आहे. २००७ मध्ये केवळ सात टक्के पाणीकपात लागू केली होती. त्यात वाढ होऊन उन्हाळ््यात मे अखेरीस १४ टक्के पाणीकपात केली जात होती. मागच्या दोन वर्षांत पाणीकपात १४ टक्के होती. आता चक्क सुरुवातीलाच २२ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.बारवी धरणाची उंची वाढविल्यास पाणीसाठा दुप्पट होणार असे सांगण्यात आले होते. हे काम अद्याप सुरूच आहे. प्रकल्पग्रस्तांनी महापालिकेमध्ये नोकरी द्यावी, अशी मागणी केली आहे. बारवी धरणाच्या उंचीचे काम पूर्ण झाले नसल्याची माहिती माजी महापौर राजेंद्र देवळकर यांनी दिली. एमआयडीसी, महापालिका आणि जलसंपदामंत्र्यांनी या पाणीकपातीचा फेरविचार केला पाहिजे, अशी लोकप्रतिनिधींची मागणी आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अगोदरच टंचाईग्रस्त असलेल्या भागाला २२ टक्के पाणीकपातीची झळ जास्त बसणार आहे. कल्याण पूर्वेतील पाणीटंचाईवर तोडगा निघालेला नाही. महापालिकेकडून तेथे ४० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. पूर्वेतील पाणीप्रश्नावर आयुक्तांसोबत नुकतीच बैठक झाली.कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांची स्वत:ची धरणे नाहीत. धरणे बांधण्यासाठी त्यांच्याकडे निधी नाही. २२ टक्के पाणीकपातीच्या त्रासातून सुटका हवी असेल तर धरण बांधणे अथवा विकत घेणे हे पर्याय आहेत. त्याचा गांभीर्याने विचार प्रशासनाने केलेला नाही.दरवर्षी लागू होणाºया कपातीतून वाचण्यासाठी ठोस उपाययोजना केली नाही तर भविष्यात आठवड्यातून तीन ते चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागेल. जळगाव अथवा लातूर शहरात १० ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होतो तशी परिस्थिती कल्याण, डोंबिवलीत निर्माण होऊ शकते. येत्या मे महिन्यात २२ टक्क्यांची कपात ३० टक्क्यांपर्यंत गेल्यास ती भविष्यातील संकटाची नांदी ठरेल, असे लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारीही मान्य करतात.