शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

Maharashtra Election 2019 : मतदार वाढले, पण मतदानाचा टक्का वाढणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 1:11 AM

Maharashtra Election 2019 : ठाण्यातील चार मतदारसंघांमध्ये ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात

ठाणे : ठाण्यातील चारपैकी दोन मतदारसंघ शिवसेनेकडे आणि भाजप आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात प्रत्येकी एक आहे. मागील निवडणुकीत या चारपैकी ठाणे शहर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ५६.५६ टक्के, कोपरी-पाचपाखाडीत ५३.१०, ओवळा -माजिवडा ५०.३१ आणि मुंब्रा -कळवा मतदारसंघात ४७.४८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यावेळी चारही मतदारसंघांत मतदारांची संख्या वाढलेली आहे. वाढलेल्या मतदारांमुळे मतदानाचा टक्का वाढणार का? आणि त्याचा फायदा कोणाला होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यंदा महायुती आणि आघाडी एकत्र लढत आहेत. त्यामुळे या चारही मतदारसंघांत सर्वाधिक मतांनी कोण निवडून येणार, यासाठी चुरस लागली आहे.

ठाणे शहर मतदारसंघात खरी लढत भाजप आणि मनसेमध्ये

ठाणे शहर मतदारसंघात पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी येथे खरी लढत ही भाजपचे विरुद्ध मनसे यांच्यात आहे. मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे वेगळे लढले होते. त्यामुळे मतांचे विभाजन झाले होते. यंदा मात्र या दोघांची युती झाली आहे. मागील निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघेही वेगळे लढले होते. आता मात्र या दोघांनी माघार घेतली आहे. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथे ५१.५३ टक्के, तर २०१४ च्या निवडणुकीत येथे ५६.५६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २००९ च्या तुलनेत येथे ५.०३ टक्के मतांची वाढ झाली होती. २०१४ मध्ये एकूण तीन लाख २२ हजार १६८ मतदारांपैकी एक लाख ८२ हजार २३३ मतदात्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी ८२ हजार ८०६ पुरुष आणि ९९ हजार ४२७ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विशेष म्हणजे पुरुष मतदात्यांच्या तुलनेत १६ हजार ६२१ अधिक महिलांनी मतदान केले होते. त्यामुळे ठाणे शहर मतदारसंघाचा निकाल स्त्री मतदारांच्या हाती होता. यंदा या मतदारांची संख्या तीन लाख ३७ हजार ९०९ एवढी असून यामध्ये एक लाख ७७ हजार १५४ पुरुष आणि एक लाख ५८ हजार ७२१ स्त्री मतदार आहेत.कोपरी-पाचपाखाडीत शिवसेना, मनसे आणि काँग्रेसची लढत

कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथे ११ उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत ही शिवसेना विरुद्ध मनसे आणि काँग्रेस यांच्यात होणार आहे. २००९ मध्ये येथे ५०.९५ टक्के, तर २०१४ मध्ये ५३.१० टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानुसार, २.१५ टक्के मतदानाची वाढ झाली होती. २०१४ मध्ये तीन लाख ४७ हजार ३८३ मतदार होते. यापैकी एक लाख ८४ हजार ४६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एक लाख ४० हजार ३४ पुरुष आणि ८० हजार ४३३ स्त्री मतदारांनी मतदान केले होते. यंदा येथे तीन लाख ५२ हजार ८५८ मतदार आहेत.

मुंब्रा-कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना

मुंब्रा-कळवा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून खरी लढत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना यांच्यात आहे. २००९ मध्ये येथे ४७ टक्के, तर २०१४ मध्ये ४७.४८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. समाजवादी, एमआयएम या निवडणुकीतून बाहेर आहे. मागील निवडणुकीत तीन लाख ४८ हजार ४११ मतदात्यांपैकी एक लाख ६५ हजार ४२७ मतदात्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी ९२ हजार ४५५ पुरुष आणि ७२ हजार ९७२ स्त्री मतदारांनी येथे मतदान केले होते. यंदा तीन लाख ५७ हजार ४९३ मतदार आहेत.

२0१४ मध्ये होती पाच टक्क्यांची वाढ

२०१४ च्या निवडणुकीत या चारही मतदारसंघांत मतदानाच्या टक्केवारीत दोन ते पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. आता मागील वेळेच्या तुलनेत मतदारांची संख्यादेखील वाढली असल्याने मतदानाची टक्केवारी वाढणार का, हे पाहणे यानिमित्ताने महत्त्वाचे ठरणार आहे.

ओवळा-माजिवड्यात शिवसेना विरुद्ध काँग्रेस आणि मनसे लढत

ओवळा-माजिवडा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचा निसटता विजय झाला होता. यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती आहे. या मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात असून खरी लढत ही शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांच्यात होणार आहे. या मतदारसंघात २००९ मध्ये ४६.८३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१४ मध्ये त्यात ३.४८ टक्के वाढ होऊन ५०.३१ टक्के मतदान झाले होते. आता या मतदारसंघात एकूण चार लाख ४९ हजार ६०२ मतदार आहेत. मागील वेळेच्या तुलनेत येथे मतदारांची संख्या ही ७९ हजार २११ ने वाढली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस