शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
3
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
4
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
5
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
6
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
7
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
8
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
9
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
10
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
11
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
12
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
13
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
14
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
15
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
16
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
17
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
18
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
19
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
20
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिका कचरा ठेकेदाराच्या कचरा गाड्या बंद करून कारवाईची ग्रामस्थांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 14:01 IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेकेदाराकडील कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचा बेफामपणा कायम असून पुन्हा एका कचरा गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

मीरारोड- मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेकेदाराकडील कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचा बेफामपणा कायम असून पुन्हा एका कचरा गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांनी ठेकेदारासह पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची आणि कचरा गाड्या बंद करण्याची मागणी केली आहे. वाहतूक पोलीस, आरटीओ ने अशा वाहनांवर कारवाईस चालवलेली टाळाटाळबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. 

मीरा भाईंदर शहराचा सर्व कचरा हा भाईंदरच्या उत्तन धावगी डोंगरावर मोठया प्रमाणात बेकायदा डम्पिंग केला जातो. वास्तविक शासनाने कचरा प्रकल्पसाठी जागा दिली असताना प्रक्रिया नाममात्र केली जातेच शिवाय मोठ्या प्रमाणात अतिक्रमणकडे पालिकेने दुर्लक्ष चालवले आहे. त्यामुळे येथे कचऱ्याचे डोंगर उभे राहून लिचेटमुळे शेतजमीन नष्ट झाली, पाणीसाठा, नवीखाडी प्रदूषित झाली. रोगराई - दुर्गंधी आणि आगी लागून पसरणाऱ्या घातक धुरामुळे प्रदूषण प्रचंड वाढून लोकांना जगणे नकोसे झाले आहे असा आक्रोश येथील नागरिकांचा आहे. 

सातत्याने तक्रारी होऊन देखील महापालिका ठोस कार्यवाही करत नाही. तर प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व नगरविकास विभाग आणि शासन देखील डोळेझाक करत आले आहे. हा सर्व त्रास कमी म्हणून कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचा हैदोस तर जीवघेणा ठरत आहे. कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यां ये - जा करताना मार्गावर दुर्गंधी पसरवत जातात शिवाय त्यातून पडणाऱ्या लिचेटमुळे रस्ते बुळबुळीत होऊन दुचाकी वाहने घसरणे आदी प्रकार नेहमीच होत असतो. 

कचरा गाड्या बेफाम आणि बेधुंद पळवल्या जातात. वाट्टेल तसे ओव्हरटेक करतात.  जेणेकरून जीवघेणे अनेक अपघात घडले आहेत. कचरा गाड्या वाहनांना धडक देणे, झाडांना वा रस्त्याच्या कडेला आदळणे असे प्रकार सर्रास होत असतात. अनेकदा चालक मद्यधुंद अवस्थेत असतात असा आरोप स्थानिकांनी सातत्याने चालवला आहे. शिवाय भरणीचे डम्पर, पाण्याचे टँकर देखील भरधाव असतात. अनेकांचे बळी जाऊन देखील वाहतूक पोलीस, आरटीओ कडून ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

शुक्रवारी उत्तन डम्पिंगकडे भरधाव जाणाऱ्या कचरा गाडीने दुचाकीला धडक दिली असता ६२ वर्षीय गेहरीलाल लालचंद जैन (छाजेड) यांचा मृत्यू झाला. अपघात करून रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या जैन यांना मदत न करताच कचरा गाडी चालक प्रदीप आत्माराम पाटील रा. सफाळे हा पळून गेला. पोलिसांनी नंतर त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. मात्र घटनेने स्थानिक नागरिकांचा संताप पुन्हा व्यक्त होऊ लागला आहे. 

बर्नड डिमेलो ( मच्छीमार नेते) -  बेकायदा कचरा डम्पिंगने स्थानिकांचे जीवन आधीच असह्य झाले आहे. त्यात पालिका कचरा गाडयांना लाईट, क्रमांक, चालक सहकारी नसतो. चालक मद्यपान करून गाड्या दामटवतात. कचरा गाड्यांचे फिटनेस प्रमाणपत्र, योग्य कागदपत्रे, चालकांची तपासणी आरटीओ, वाहतूक पोलिसांनी काटेकोर व नियमित करून कारवाई केली पाहिजे. 

जेम्स बोर्जिस ( डोंगरी - पालखाडी ग्रामस्थ ) - कचरा ठेकेदार, गाडी चालक - मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून ठेका रद्द करावा. बेकायदा कचरा वाहतूक व डंपिंग बंद करावे अशी मागणी सातत्याने नागरिकांची आहे. कचरा गाड्याच्या जवळून जाणे म्हणजे यमदूताच्या जवळ जाणे अशी भीती वाटते.  पोलीस व आरटीओने कचरा गाड्या व चालकांवर कठोर कारवाई करावी. डोंगरी मार्गावर अवजड वाहनांना वेग मर्यादा निश्चित करावी.   

English
हिंदी सारांश
Web Title : Villagers demand action, halt garbage trucks after fatal accident.

Web Summary : Outraged villagers demand action after a fatal accident involving a Mira Bhayandar municipal garbage truck. They seek the arrest of the contractor and officials, halting the trucks due to reckless driving, illegal dumping, and environmental damage. Residents cite pollution and demand stricter enforcement by police and RTO.
टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरGarbage Disposal Issueकचरा प्रश्नDeathमृत्यूMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक