शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

मीरा भाईंदर महापालिका कचरा ठेकेदाराच्या कचरा गाड्या बंद करून कारवाईची ग्रामस्थांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 14:01 IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेकेदाराकडील कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचा बेफामपणा कायम असून पुन्हा एका कचरा गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

मीरारोड- मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेकेदाराकडील कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचा बेफामपणा कायम असून पुन्हा एका कचरा गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांनी ठेकेदारासह पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची आणि कचरा गाड्या बंद करण्याची मागणी केली आहे. वाहतूक पोलीस, आरटीओ ने अशा वाहनांवर कारवाईस चालवलेली टाळाटाळबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. 

मीरा भाईंदर शहराचा सर्व कचरा हा भाईंदरच्या उत्तन धावगी डोंगरावर मोठया प्रमाणात बेकायदा डम्पिंग केला जातो. वास्तविक शासनाने कचरा प्रकल्पसाठी जागा दिली असताना प्रक्रिया नाममात्र केली जातेच शिवाय मोठ्या प्रमाणात अतिक्रमणकडे पालिकेने दुर्लक्ष चालवले आहे. त्यामुळे येथे कचऱ्याचे डोंगर उभे राहून लिचेटमुळे शेतजमीन नष्ट झाली, पाणीसाठा, नवीखाडी प्रदूषित झाली. रोगराई - दुर्गंधी आणि आगी लागून पसरणाऱ्या घातक धुरामुळे प्रदूषण प्रचंड वाढून लोकांना जगणे नकोसे झाले आहे असा आक्रोश येथील नागरिकांचा आहे. 

सातत्याने तक्रारी होऊन देखील महापालिका ठोस कार्यवाही करत नाही. तर प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व नगरविकास विभाग आणि शासन देखील डोळेझाक करत आले आहे. हा सर्व त्रास कमी म्हणून कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचा हैदोस तर जीवघेणा ठरत आहे. कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यां ये - जा करताना मार्गावर दुर्गंधी पसरवत जातात शिवाय त्यातून पडणाऱ्या लिचेटमुळे रस्ते बुळबुळीत होऊन दुचाकी वाहने घसरणे आदी प्रकार नेहमीच होत असतो. 

कचरा गाड्या बेफाम आणि बेधुंद पळवल्या जातात. वाट्टेल तसे ओव्हरटेक करतात.  जेणेकरून जीवघेणे अनेक अपघात घडले आहेत. कचरा गाड्या वाहनांना धडक देणे, झाडांना वा रस्त्याच्या कडेला आदळणे असे प्रकार सर्रास होत असतात. अनेकदा चालक मद्यधुंद अवस्थेत असतात असा आरोप स्थानिकांनी सातत्याने चालवला आहे. शिवाय भरणीचे डम्पर, पाण्याचे टँकर देखील भरधाव असतात. अनेकांचे बळी जाऊन देखील वाहतूक पोलीस, आरटीओ कडून ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

शुक्रवारी उत्तन डम्पिंगकडे भरधाव जाणाऱ्या कचरा गाडीने दुचाकीला धडक दिली असता ६२ वर्षीय गेहरीलाल लालचंद जैन (छाजेड) यांचा मृत्यू झाला. अपघात करून रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या जैन यांना मदत न करताच कचरा गाडी चालक प्रदीप आत्माराम पाटील रा. सफाळे हा पळून गेला. पोलिसांनी नंतर त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. मात्र घटनेने स्थानिक नागरिकांचा संताप पुन्हा व्यक्त होऊ लागला आहे. 

बर्नड डिमेलो ( मच्छीमार नेते) -  बेकायदा कचरा डम्पिंगने स्थानिकांचे जीवन आधीच असह्य झाले आहे. त्यात पालिका कचरा गाडयांना लाईट, क्रमांक, चालक सहकारी नसतो. चालक मद्यपान करून गाड्या दामटवतात. कचरा गाड्यांचे फिटनेस प्रमाणपत्र, योग्य कागदपत्रे, चालकांची तपासणी आरटीओ, वाहतूक पोलिसांनी काटेकोर व नियमित करून कारवाई केली पाहिजे. 

जेम्स बोर्जिस ( डोंगरी - पालखाडी ग्रामस्थ ) - कचरा ठेकेदार, गाडी चालक - मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून ठेका रद्द करावा. बेकायदा कचरा वाहतूक व डंपिंग बंद करावे अशी मागणी सातत्याने नागरिकांची आहे. कचरा गाड्याच्या जवळून जाणे म्हणजे यमदूताच्या जवळ जाणे अशी भीती वाटते.  पोलीस व आरटीओने कचरा गाड्या व चालकांवर कठोर कारवाई करावी. डोंगरी मार्गावर अवजड वाहनांना वेग मर्यादा निश्चित करावी.   

English
हिंदी सारांश
Web Title : Villagers demand action, halt garbage trucks after fatal accident.

Web Summary : Outraged villagers demand action after a fatal accident involving a Mira Bhayandar municipal garbage truck. They seek the arrest of the contractor and officials, halting the trucks due to reckless driving, illegal dumping, and environmental damage. Residents cite pollution and demand stricter enforcement by police and RTO.
टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरGarbage Disposal Issueकचरा प्रश्नDeathमृत्यूMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक