शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

गायनात करिअरसाठी जिद्द, चिकाटी हवी , उत्तरा केळकर यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 00:33 IST

आपले ध्येय निश्चित असेल तर उच्च शिखरावर पोहोचता येते. माझे पार्श्वगायिकेचे ध्येय निश्चित असल्याने त्यादृष्टीने मेहनत केली.

डोंबिवली : आपले ध्येय निश्चित असेल तर उच्च शिखरावर पोहोचता येते. माझे पार्श्वगायिकेचे ध्येय निश्चित असल्याने त्यादृष्टीने मेहनत केली. गायनात करिअर करू इच्छिणाऱ्यांना जिद्द आणि चिकाटीची कास धरावी लागेल, असा मोलाचा सल्ला सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांनी दिला.‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे ‘पुन्हा एक कलाकार, एक संध्याकाळ’ या कार्यक्रमांतर्गत रविवारी येथील सुयोग मंगल कार्यालयात केळकर यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ गायक वसंत आजगावकर यांच्या हस्ते केळकर यांचा सन्मान करण्यात आला.केळकर म्हणाल्या, आॅडिओ उद्योग काळाच्या ओघात मागे पडल्याने नवीन मुलांना नवनवीन गाण्यासाठी संधी मिळत नाही. आमच्या काळात आम्ही नवनवीन गाणी गायिली. त्यामुळे प्रसिद्धी मिळाली आणि नाव झाले. यशवंत देव, फिरोज दस्तुर, श्रीकांत ठाकरे या माझ्या गुरूंनी माझ्यातील कलागुणांना बहर आणला. प्रत्येक गाणे जबाबदारीने गायल्याने करिअरमध्ये पुढची गाणी आपोआप मिळत गेली. गायनाचा रियाज हा सातत्याने चालू ठेवला पाहिजे.आपले वय जसे वाढत जाते, तसा आवाजाचा स्पीच खाली येतो. स्नायू थकायला लागतात. त्यासाठी स्पीच थेरपिस्टकडे जाऊन योग्य तो व्यायाम करण्याची गरज आहे. सुगम संगीतात करिअर करायचे असल्यास शास्त्रीय संगीताचे ज्ञानही आवश्यक असते. सुगम संगीत चांगल्या तोडीचे गाता येण्यासाठी ती गाणी सतत ऐकली पाहिजे. भावगीते ऐकली पाहिजे. ती गाणी सतत गुणगुणली पाहिजे. गाणी रेकॉर्डिंगमध्ये डबिंग पद्धत सुरू झाल्यावर ती कमी वेळेत पूर्ण होऊ लागली. चाल आॅन द स्पॉट सांगितली की, ती विसरायला होते. परंतु, रियाज करून गाणी गायल्यास ती कायम लक्षात राहतात. थंड आणि तेलकट वस्तूंचे सेवन न करण्याचा नियम मी कायम पाळत असल्याचे त्यांनी सांगितले.श्रोते पाहून मी गाण्यांची निवड करते. तरुण प्रेक्षक असल्यास उडत्या गाण्यांना प्राधान्य देते, तर वयोवृद्ध प्रेक्षकांसाठी भावगीतांची निवड करते. प्रेक्षकांनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याबद्दल विचारताच त्यांनी त्या दोघीही सर्वच दृष्टीने श्रेष्ठ असल्याने त्यांच्याबद्दल काहीही बोलण्याची माझी पात्रता नसल्याचे त्यांनी नमूद केले. कुटुंबाबद्दल बोलताना केळकर म्हणाल्या, मी पार्श्वगायिका म्हणून नाव कमवावे, अशी माझ्या पतींची इच्छा होती. त्यासाठी ते नेहमीच मला पाठिंबा देत असत. सासूसासरे हौशी असल्याने त्यांनीही कायम साथ दिली. त्याचबरोबर घरातील गडीमाणसांनी माझा संसार सांभाळला.लावणी या गायनप्रकाराचे शिक्षण मला संगीतकार राम कदम आणि विश्वनाथ मोरे यांनी दिले. डॉ. अशोक रानडे व पु.ल. देशपांडे यांचा सहभाग असलेल्या ‘बैठकीची लावणी’ या कार्यक्रमात वेगळ्या शैलीतील, वेगळ्या तालातील, दुर्मीळ अशा लावण्या गाण्याची संधी मिळाली. लावणी गाताना संकोच बाळगू नये व शब्दांना प्राधान्य द्यावे, असा सल्लाही केळकर यांनी दिला.केळकर यांनी ‘चिकमोत्यांची माळ’, ‘खोप्यामध्ये खोपा’, ‘बंधू येईल न्यायला गौरी गणपतीच्या सणाला’, यासारखी गाणी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.१४ गाणी गाण्याची संधी मिळालीकरिअरविषयक किस्से सांगताना त्या म्हणाल्या, की भीमसेन जोशी यांनी बहिणाबार्इंची दोन गाणी गाण्यासाठी मला बोलावले होते. त्यावेळी जोशी यांनी सांगितले की, ही गाणी खूप चांगली गायल्यास पुढची १४ गाणी तुला गाण्याची संधी मिळेल. त्यानुसार, मी ती दोन गाणी उत्तमरीत्या सादर केली आणि पुढची १४ ही गाणी माझ्याच आवाजात रेकार्ड झाली.

टॅग्स :musicसंगीतthaneठाणे