शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

वीस तास आग, ३० कोटींचा बांबू खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 12:01 PM

अग्नितांडवामुळे बल्लारपूर - आलापल्ली मार्ग आठ तास बंद

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर (जि. चंद्रपूर) : वणवा भडकून कळमना बांबू डेपोला रविवारी लागलेली आग तब्बल २० तास धुमसत होती. त्यात ५० हजार टन बांबू व निलगिरीचे लाकूड खाक झाले असून, ३० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बल्लारपूरहून आलापल्लीकडे कळमना मार्गाने जाणारी वाहतूक आगीमुळे आठ तास बंद ठेवण्यात आली होती. आग अजूनही पूर्णपणे विझलेली नाही.  कळमनाच्या चोरमोडी नाल्याजवळ कोणी तरी आग लावल्यामुळे रविवारी सकाळपासून वणवा पेटला होता. तो अधिक भडकून बांबू डेपोपर्यंत गेला व  डेपोला आग लागली. 

२५ अग्निशमन बंब दाखल  आग विझविण्यासाठी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर येथील अग्निशमन दलाचे बंब व पथक दाखल झाले. बल्लारपूर नगर परिषद, चंद्रपूर महानगरपालिका, दुर्गापूर, घुग्गुस, नागभीड, भद्रावती, राजुरा, गडचांदूर, आवारपूर, उपरवाही, नागपूर, गडचिरोली, चामोर्शी येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या २५ पथकांनी २० तास अविरत मेहनत घेऊन आग बऱ्यापैकी आटोक्यात आणली.

पेट्रोलपंप पूर्ण जळालेडेपो पूर्णपणे जळाल्यानंतर आगीने जवळच्या पेट्रोलपंपालाही कवेत घेतले. सुदैवाने पंप चार दिवसांपासून बंद असल्याने पंपात पेट्रोल आणि डिझेलचा केवळ मृत साठा होता. मात्र, पंप जळाल्याने पंपमालक फुलझेले यांचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. 

आग कशाने लागली, याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. दोन दिवसांपासून सर्व प्रशासन मिळून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. नुकसान किती झाले, हे सांगता  येणार नाही. अजूनही नुकसान मोजणीचे काम सुरू आहे. - संजय राईंचवार, तहसीलदार, बल्लारपूर

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलbadlapurबदलापूर