शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

माणुसकीचा अंत! कॅन्सर रुग्णाचा दुचाकीवरून मुलुंड ते भिवंडीपर्यंतचा ट्रिपल सीट जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 20:11 IST

या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी पोलिसांनी अडवलं, पण नाकात नळी लावलेला रुग्ण दिसल्यावर जाऊ दिले.

भिवंडी: सध्याच्या कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन झालेल्या काळात लाखो भुकेल्यांची भूक भागविण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले असतानाच एक शस्त्रक्रिया झालेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णाला मुलुंड ते भिवंडी येथे निवासस्थानी सोडण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या कॅन्सर पीडित रुग्णाला त्याच्या मुलाने दवाखान्यातील सामानाच्या पिशव्या घेऊन आईसह दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करावा लागला. या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी पोलिसांनी अडवलं, पण नाकात नळी लावलेला रुग्ण दिसल्यावर जाऊ दिले. पण कोणीही तीन रुग्णवाहिका अथवा वाहनांची व्यवस्था करून दिली नाही हे पाहिल्यावर म्हणावंसं वाटते की, येथे ओशाळली माणुसकी.....

भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरात राहणारे विरस्वामी कोंडा यांना तोंडाचा कर्करोग झाला होता .त्यांच्या पत्नी लक्ष्मी यांनी त्यांच्या वर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मुंबई टाटा कर्करोग रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यासाठी 20 हजार रुपये जमा केले. परंतु तीन महिने झाल्यावर तुमच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन महिने थांबावे लागेल, खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचे सुचवित त्यासाठी मुलुंड येथील एका खासगी हॉस्पिटलचे नाव सुचविले. या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर लॉकडाऊनमुळे या रुग्णाची व त्यांच्या परिवाराची मोठी परवड झाली. 

शस्त्रक्रिया झाल्यावर डॉक्टरांनी घरी जाण्याचे सुचविले, परंतु त्या दरम्यान कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र बंद असल्याने डॉक्टरांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला. त्यानंतर रुग्णाच्या नाकातील जेवण देण्याची नळी बदलणे, इतर ट्रीटमेंट करणे यासाठी पुन्हा भिवंडीवरून येणे जमणार नसल्याने लक्ष्मी कोंडा यांनी मुलुंड परिसरातील गुरुद्वारात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या ठिकाणीसुद्धा आठ दिवस झाल्यानंतर तेथील व्यवस्थापकांनी घरी जाण्याबाबत तगादा लावल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा ते भिवंडी येथील आपल्या घरी दुचाकीवरून रुग्णासह मुलाबरोबर जीवघेणा प्रवास करून घर गाठले.  

विरस्वामी कोंडा यांचा मुलगा राजू कोंडा याने परिसरात वडिलांना घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका विचारणा केली तर अव्वाच्या सव्वा दर आकारत कोणी 4 तर कोणी 5 हजार रुपयांची मागणी करू लागल्याने राजू कोंडा याने आपल्या वडिलांसह आईला दुचाकीवरून ट्रिपल सीट भिवंडी येथे घेऊन येण्याचा निर्णय घेतला, सोबत रुग्णालयात घेऊन गेलेले साहित्य यांच्या तीन भल्या मोठ्या पिशव्या घेऊन हा प्रवास भिवंडीपर्यंत झाला. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असताना हे ट्रिपल सीट कुटुंबीय आलेच कसे हा प्रश्न प्रत्येकाला सतावतो ,पण पोलीस बाईक वर पेशंट असल्याचे बघून पुढे जाऊ देत होते ,परंतु या पैकी कोणीही या रुग्णासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान  ठाण्यात रस्त्यात बाईकमधील पेट्रोल संपले अशा अवस्थेत एक नागरिक देवदूत बनून आला ज्याने आपल्या बाईक मधील पेट्रोल काढून तो यांच्या बाईक मध्ये दिल्याने ते कसेबसे रात्री 10.30 वाजता भिवंडी शहरात दाखल झाले .

शासकीय यंत्रणा, विविध स्वयंसेवी संस्था सध्याच्या करोना विरुद्धच्या लढ्यात आपापल्या परीने काम करीत असताना सुमारे 25 किलोमीटर च्या प्रवासात एक ही भेटू नये, पोलिसांनी जिल्हा प्रशासनाशी बोलून त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असती तर अशा परिस्थितीत या रुग्णाची अशी परवड झाली नसती. सर्वांच्या मनातील माणुसकी अशा आणीबाणीच्या काळात कठोर झाली का ? असा प्रश्न यानिमित्ताने समोर येतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस