शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात जिल्ह्यात 11,438 कुपोषितांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:52 IST

महिला व बालकल्याण विभागाने पोषण आहाराचे घरपोच केले वाटप

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्याच्या आदिवासी दुर्गम, अतिदुर्गम आणि ग्रामीण भागांच्या गावपाड्यांसह खेड्यांमध्ये आजमितीस एक हजार ६९० कुपोषित (सॅम, मॅम) बालके जिल्ह्यात रांगत आहेत, तर कोरोना कालावधीत म्हणजे कोरोना  प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या संचारबंदीत ११ हजार ४३८ तीव्र व मध्यम कुपोषित बालकांवर आरोग्य यंत्रणेने उपचार केले आहेत. त्यांच्या सुदृढ आरोग्याकरिता महिला व  बालकल्याण विभागाने पोषण आहाराचे घरपोहोच वाटप करून त्यांची काळजी घेतली. यामध्ये तीव्र कुपोषित एक हजार १५ बालकांसह मध्यम कुपोषित दहा हजार ४२३ बालकांचा समावेश आहे. मात्र, कोरोनाच्या संचारबंदीत जिल्हाभरातील गावपाड्यांमध्ये कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होऊन वर्षभरात तब्बल ११ हजार ४३८ बालकांवर उपचार करावा लागल्याचे अहवालावरून उघड झाले आहे.जिल्ह्यात गावपाड्यांतील या कुपोषित बालकांच्या सुदृढतेसाठी शहापूर, डोळखांब या दोन मोठ्या प्रकल्प कार्यालयांसह सात अंशत: आदिवासी प्रकल्प कार्यालये सक्रिय आहेत. या यंत्रणेद्वारे व आरोग्य विभागाच्या निगराणीत या १४७ तीव्र कुपोषित (सॅम) बालकांसह मध्यम कुपोषित (मॅम) एक हजार ५४३, असे एक हजार ६९० कुपोषित आहेत.कुपोषित मुलांवर उपचार करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असून त्यांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आले असल्याचे दिसून येत आहे.

 जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यात सध्याच्या प्रत्येक कुपोषित बालकाचे ट्रेसिंग व ट्रेकिंग, सीटीसी, एनआरसी आणि व्हीसीडीसीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. दत्तक पालक योजनेवर कुषोषित बालकांची श्रेणी सुधारण्यावर भर दिला जात आहे. याकरिता महिला बालविकास विभाग आणि आरोग्य विभागाच्या समन्वयावर भर दिला जात आहे. यातून नियमित पर्यवेक्षण व संनियंत्रणावर लक्ष दिले जात आहे.     - भाऊसाहेब दांगडे, मुख्य कार्यकारी     अधिकारी, जि. प. ठाणे

१७७३ बालके पाच वर्षांत कुपोषणमुक्तnजिल्ह्यातील एक हजार ७७३ बालके पाच वर्षांत कुपोषणमुक्त झाली आहेत. गेल्या वर्षाच्या कालावधीत ३५७ तीव्र कुपोषित बालकांमध्ये सुधारणा होऊन ते कुपोषणमुक्त झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक ५०७ तीव्र कुपोषित बालके २०१६ ला कुपोषणमुक्त झाली आहेत. nत्याखालोखाल २०१७ ला ४१६ बालके, तर २०१८ व २०१९ या दोन वर्षांच्या कालावधीत अनुक्रमे २६४ व २२९ तीव्र कुपोषित बालके या जीवघेण्या कुपोषणातून मुक्त झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. nमात्र, कोरोनाच्या संचारबंदीत जिल्हाभरातील गावपाड्यांमध्ये कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होऊन वर्षभरात तब्बल ११ हजार ४३८ बालकांवर वर्षभर उपचार करावा लागला आहे.