शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

टीएमटीच्या नव्या २५ बस दुरुस्तीअभावी धूळखात

By admin | Updated: January 2, 2016 08:33 IST

प्रत्येक बसचे आयुर्मान साधारणपणे १० वर्षांचे असते, परंतु परिवहन सेवेने जेएनएनयूआरएमअंतर्गत घेतलेल्या बस केवळ तीन वर्षे रस्त्यावर धावल्यानंतर गेली सात वर्षे दुरुस्तीच्या

ठाणे : प्रत्येक बसचे आयुर्मान साधारणपणे १० वर्षांचे असते, परंतु परिवहन सेवेने जेएनएनयूआरएमअंतर्गत घेतलेल्या बस केवळ तीन वर्षे रस्त्यावर धावल्यानंतर गेली सात वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली कळवा आगारात धूळखात पडल्याची बाब शुक्रवारी विरोधी पक्षनेते संजय भोईर यांच्या पाहणी दौऱ्यात उघड झाली. या आगारात जेएनएनयूआरएमच्या ६० बस असून त्यातील २५ बस या अशा प्रकारे गंजत पडल्या असून आता त्यांचे आयुष्यही संपुष्टात येणार आहे.वागळे आगाराची झाडाझडती घेतल्यानंतर शुक्रवारी हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या वेळी त्यांच्यासमवेत स्थानिक नगरसेवक मुकुंद केणी आणि प्रमिला केणी आदी उपस्थित होते. या वेळी कर्मचाऱ्यांनी आपली गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडली. या आगाराची अवस्था दयनीय असून शेड तुटलेल्या स्वरूपात आहे. नवीन टायरची मागणी अधिक प्रमाणात असूनही खूप कमी प्रमाणात टायर पुरविले जातात. गाड्यांना लागणारे सुटे भाग विकत घेण्यात आले होते, पण ज्या गाड्यांना ते पार्ट लागतात, त्या बसच येथे नसल्याची धक्कादायक माहितीही समोर आली. या आगारात असलेल्या ६८ गाड्यांपैकी केवळ ३५ च्या आसपास गाड्या रस्त्यावर धावत आहेत. भांडारगृहात जे सुटे भाग उपलब्ध आहेत, ते कोणत्याही गाड्यांना उपयोगात न येणारे आहेत. त्यामुळे ज्या गाड्यांना पार्ट्स हवे आहेत, त्यांना ते मिळू शकलेले नाहीत. १२ बस या भंगारात काढण्याच्या लायकीच्या असून कॅन्टीनची जागा हे भंगाराचे आगार झाले असल्याची बाबही दिसून आली. कार्यशाळेचे पत्रेही खराब, तुटलेले आहेत. ते दुरुस्त करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. - संबंधित वृत्त / ५जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून या आगारात ६० बस देण्यात आल्या असल्या तरी त्यातील २५ बस मागील सात वर्षांपासून धूळखात पडल्या आहेत. त्यांचे आयुर्मान १० वर्षांचे आहे. या बसच्या इंजीन आणि सांगाड्याचे काम शिल्लक असून प्रत्येक बसचा दुरुस्तीचा खर्च हा साधारणपणे १० लाखांच्या घरात असल्याची माहिती कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी दिली. त्यातही ज्या बस भंगारात काढायच्या आहेत, त्यांचे ई-आॅक्शन उशिराने झाल्याने जे दर येणे अपेक्षित होते, ते न आल्याने या बसही सडत पडल्या आहेत. या बस जर वेळेत भंगारात काढल्या असत्या तर मात्र परिवहनच्या आगारातील सर्वच बसची दुरुस्ती होऊ शकली असती, असा दावा विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी केला. या आगारातील कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.