शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

मुंबई महानगराची तहान भागणार; शाई, सुसरी, काळ धरणांचा मार्ग मोकळा, कामाला लवकरच सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 07:07 IST

वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणामुळे मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणामुळे मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या प्रदेशातील प्रस्तावित केलेल्या आणि बांधकाम सुरू असलेल्या अनेक धरणांंची कामे सिंचन घोटाळ्यात अडकल्याने त्यांच्या वाढीव आणि प्रस्तावित कामांंची निविदा प्रक्रिया २०१६ पासून थांंबविण्यात आली होती. मात्र, आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या क्लीन चिटनंतर ही कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

यात ठाण्यासाठी शाई धरणासह सुसरी, काळ, चणेरा, शिरसिंगे आणि जामदा धरणांचा समावेश आहे. सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर १२ प्रकल्पांची चौकशी करण्यात आली. त्यात या सहा प्रकल्पांत घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध झाल्यानंंतर  मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत या धरणांची कामे करण्यास हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार,  जलसंपदा विभागाने या सहा धरणांची कामे करण्यास २२ डिसेंबर  रोजी अनुमती दिली. शहरी भागातच आजघडीला पाण्याची सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतकी टंचाई जाणवत आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११ हजार २७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. यामुळे या वाढत्या लोकसंख्येची तहान भागवणार कशी, हा गंभीर प्रश्न आहे.

ही धरणे अडकली होती चौकशीच्या फेऱ्यात

सरकारने काळू, शाई, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा, सुसरी, पोशीर यासारखी जी धरणे प्रस्तावित केली. मात्र, अनेकांंची जमीनच संपादित झालेली नाही. तर कोंढाणे, बाळगंगा, शाई, सुसरी, काळ, शिरसिंंगे, जामदा ही धरणे चौकशीच्या फेऱ्यात अडकली होती. परंतुु, आता ती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महानगरांना दिलासा 

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील शेतजमिनीसह वनजमिनीवर पिंजाळ, गारगाई, सुसरी, काळू, कवडास, शाई, पोशीर ही धरणे आकार घेणार आहे. मुंबई पालिकेने गारगाई धरण रद्द केले आहे. सुसरी, शाई धरणांची कामे करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने दिलासा मिळणार आहे. ‘शाई’साठी तर ठाणे पालिकेने निधीची तयारी दर्शविली आहे. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईDamधरण