शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

मुंबई महानगराची तहान भागणार; शाई, सुसरी, काळ धरणांचा मार्ग मोकळा, कामाला लवकरच सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 07:07 IST

वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणामुळे मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणामुळे मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या प्रदेशातील प्रस्तावित केलेल्या आणि बांधकाम सुरू असलेल्या अनेक धरणांंची कामे सिंचन घोटाळ्यात अडकल्याने त्यांच्या वाढीव आणि प्रस्तावित कामांंची निविदा प्रक्रिया २०१६ पासून थांंबविण्यात आली होती. मात्र, आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या क्लीन चिटनंतर ही कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

यात ठाण्यासाठी शाई धरणासह सुसरी, काळ, चणेरा, शिरसिंगे आणि जामदा धरणांचा समावेश आहे. सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर १२ प्रकल्पांची चौकशी करण्यात आली. त्यात या सहा प्रकल्पांत घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध झाल्यानंंतर  मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत या धरणांची कामे करण्यास हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार,  जलसंपदा विभागाने या सहा धरणांची कामे करण्यास २२ डिसेंबर  रोजी अनुमती दिली. शहरी भागातच आजघडीला पाण्याची सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतकी टंचाई जाणवत आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११ हजार २७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. यामुळे या वाढत्या लोकसंख्येची तहान भागवणार कशी, हा गंभीर प्रश्न आहे.

ही धरणे अडकली होती चौकशीच्या फेऱ्यात

सरकारने काळू, शाई, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा, सुसरी, पोशीर यासारखी जी धरणे प्रस्तावित केली. मात्र, अनेकांंची जमीनच संपादित झालेली नाही. तर कोंढाणे, बाळगंगा, शाई, सुसरी, काळ, शिरसिंंगे, जामदा ही धरणे चौकशीच्या फेऱ्यात अडकली होती. परंतुु, आता ती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महानगरांना दिलासा 

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील शेतजमिनीसह वनजमिनीवर पिंजाळ, गारगाई, सुसरी, काळू, कवडास, शाई, पोशीर ही धरणे आकार घेणार आहे. मुंबई पालिकेने गारगाई धरण रद्द केले आहे. सुसरी, शाई धरणांची कामे करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने दिलासा मिळणार आहे. ‘शाई’साठी तर ठाणे पालिकेने निधीची तयारी दर्शविली आहे. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईDamधरण