शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुंबई महानगराची तहान भागणार; शाई, सुसरी, काळ धरणांचा मार्ग मोकळा, कामाला लवकरच सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 07:07 IST

वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणामुळे मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणामुळे मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या प्रदेशातील प्रस्तावित केलेल्या आणि बांधकाम सुरू असलेल्या अनेक धरणांंची कामे सिंचन घोटाळ्यात अडकल्याने त्यांच्या वाढीव आणि प्रस्तावित कामांंची निविदा प्रक्रिया २०१६ पासून थांंबविण्यात आली होती. मात्र, आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या क्लीन चिटनंतर ही कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

यात ठाण्यासाठी शाई धरणासह सुसरी, काळ, चणेरा, शिरसिंगे आणि जामदा धरणांचा समावेश आहे. सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर १२ प्रकल्पांची चौकशी करण्यात आली. त्यात या सहा प्रकल्पांत घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध झाल्यानंंतर  मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत या धरणांची कामे करण्यास हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार,  जलसंपदा विभागाने या सहा धरणांची कामे करण्यास २२ डिसेंबर  रोजी अनुमती दिली. शहरी भागातच आजघडीला पाण्याची सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतकी टंचाई जाणवत आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११ हजार २७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. यामुळे या वाढत्या लोकसंख्येची तहान भागवणार कशी, हा गंभीर प्रश्न आहे.

ही धरणे अडकली होती चौकशीच्या फेऱ्यात

सरकारने काळू, शाई, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा, सुसरी, पोशीर यासारखी जी धरणे प्रस्तावित केली. मात्र, अनेकांंची जमीनच संपादित झालेली नाही. तर कोंढाणे, बाळगंगा, शाई, सुसरी, काळ, शिरसिंंगे, जामदा ही धरणे चौकशीच्या फेऱ्यात अडकली होती. परंतुु, आता ती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महानगरांना दिलासा 

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील शेतजमिनीसह वनजमिनीवर पिंजाळ, गारगाई, सुसरी, काळू, कवडास, शाई, पोशीर ही धरणे आकार घेणार आहे. मुंबई पालिकेने गारगाई धरण रद्द केले आहे. सुसरी, शाई धरणांची कामे करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने दिलासा मिळणार आहे. ‘शाई’साठी तर ठाणे पालिकेने निधीची तयारी दर्शविली आहे. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईDamधरण