शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

क्लायमेट सिटीत ठाणे देशात दुसऱ्या क्रमांकावर; सकारात्मक वातावरण बदलासाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 03:00 IST

मागील काही वर्षांत हवेची गुणवत्ता राखण्यात पालिकेला यश आले आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या एनर्जी आणि ग्रीन बिल्डिंग, अर्बन प्लानिंग, ग्रीन कव्हर, बायोडायव्हर्सिटी, ट्रान्सपोर्ट आणि हवा गुणवत्ता तसेच पाण्याचे नियोजन आणि वेस्ट मॅनेजमेंटवर केलेले विविध प्रयोग या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबविलेल्या या योजनांमुळे ठाणे शहराने स्मार्ट सिटी क्लायमेटमध्ये अर्थात वातावरणातील सकारात्मक बदलासाठी सक्षम असलेल्या शहरांमध्ये देशातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये पहिला क्रमांक इंदूर या शहराचा लागला असून तिसºया क्रमांकावर सुरत आहे. त्यामुळे ठाण्याच्या मानात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या वर्षी ठाणे शहर यात सहाव्या क्रमाकांवर होते. यंदा चार क्रमाकांची आघाडी घेऊन दुसरे स्थान पटकाविले आहे.दिल्लीमधील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अर्बन अफेअर्सने घेतलेल्या स्पर्धेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. यामध्ये ठाणे शहराचा क्रमांकदुसरा आला आहे. या स्पर्धेत देशातील १०० शहरे सहभागी झाली होती. त्यानुसार, विविध माध्यमांतून ठाणे शहराने आपली छाप सोडल्याचे दिसून आले आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत शहराचा ग्रीन कव्हर वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. ठाण्याचा विचार केल्यास शहराचे विकसित क्षेत्र हे ४६ टक्के एवढे आहे, तर २५ टक्के हरित क्षेत्र आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजनही महापालिकेने राबविले असून स्मार्ट मीटरचा वापर सुरूकेला आहे. तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिकेने रिमॉडेलिंगची योजना पुढे आणली आहे. ऊर्जा कार्यक्षमता आणि नवीनीकरणीय ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून सौरऊर्जेवर निर्माण करणारी यंत्रणा, सौरऊर्जेवर चालणारे सिग्नल, सौरब्लिंकर्स, बायोमिथेनायझेन प्रक्रिया, महापालिका शाळांवर सौरऊर्जेवर वीजनिर्मिती आणि शहरात लावण्यात येत असलेले एलईडी दिवे यामुळेदेखील पालिकेने मागील पाच वर्षांत मेहनत घेतली आहे. तसेच ग्रीन बिल्डिंग संकल्पना राबवून एक वेगळा प्रयत्न सुरू केला आहे. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न झाले आहेत.हवेची गुणवत्ता राखण्यात यशमागील काही वर्षांत हवेची गुणवत्ता राखण्यात पालिकेला यश आले आहे. सण-उत्सवांच्या काळात हवेची गुणवत्ता व्यवस्थित राहावी, यासाठी जनजागृती मोहीम, हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध चौकांत लावलेली यंत्रणा यामुळेदेखील हवेची गुणवत्ता सुधारली आहे. तसेच इतरही योजना राबवून पालिकेने शहरात अर्बन प्लानिंगच्या दिशेने योग्य ती पावले टाकली आहेत. वेस्ट मॅनेजमेंटमध्येही पालिकेच्या माध्यमातून विविध योजना हाती घेतल्या आहेत. या सर्वांची दखल घेतल्यामुळेच ठाणे शहर हे देशात दुसºया क्रमाकांवर आले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका