शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

ठाण्यात मेट्रो भूमिगत हवी; नागरिक प्रतिष्ठान, कोंडी कशी सुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:55 PM

ठाण्यात बांधण्यात येणारी मेट्रो-४ ही उन्नत असून यामुळे वाहतूककोंडी सुटणार कशी असा सवाल करून ती उन्नत नको तर भूमिगत करावी, अशी मागणी ठाणे नागरिक प्रतिष्ठानने सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ठाणे : ठाण्यात बांधण्यात येणारी मेट्रो-४ ही उन्नत असून यामुळे वाहतूककोंडी सुटणार कशी असा सवाल करून ती उन्नत नको तर भूमिगत करावी, अशी मागणी ठाणे नागरिक प्रतिष्ठानने सोमवारी पत्रकार परिषदेत केली.हा मेट्रो प्रकल्प पूर्वी हा भूमिगत राबविण्यात येत होता. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात आळा बसून वाहतूककोंडीमुक्त ठाणे झाले असते. परंतु, ठाण्यात चेकनाका ते कासारवडवली मेट्रो प्रकल्प आता उन्नत उभारण्यात येत आहे. वडाळा ते कासारवडवली हा ३२ कि.मी ची प्रकल्प हा दोन महानगरांना जोडणारा हा प्रकल्प मोठी आर्थिक गुंतवणूक असलेला असून त्याची उभारणी अत्यंत चिंचोळ््या रस्त्यावर केली जात आहे. तो चालू करण्यापूर्वी आवश्यक असलेली जनतेची सुनावणी अत्यंत घाईघाईत उरकण्यात आली, याविषयी जनतेमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न आणि मागण्या काय आहेत याची दखल घेतली गेली नाही व जनतेला आपले गाºहाणे मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली नसल्याचा आरोप प्रतिष्ठानने यावेळी केला.डीपीआरमध्ये अनेक बाबींचा विचार नाहीया प्रकल्पाच्या एमएमआरडीएने प्रसिद्ध केलेल्या डीपीआरमध्ये त्याचे उद्दिष्ट काय आहे हे स्पष्ट करताना फक्त कमी होणारा खर्च व वेगात अंमलबजावणी हे दोनच निकष दिलेले आहेत. पण यात व्यापक नियोजन, भू संपादनाची किंमत विचारात न घेणे, पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची किंमत गृहीत न धरणे, वाहतुकीचे व संपर्काचे अन्य प्रश्न दुर्लक्षिले गेले आहेत. याबरोबर वाहतूक विभागानेही कापूरबावडी येथील कामामुळे होत असलेल्या प्रचंड वाहतूककोंडीवरउपाय शोधेस्तोवर मेट्रो-४ चे काम सहा महिने पुढे ढकलावे, अशा आशयाचे पत्र एमएमआरडीए दिले आहे.न्यायालयात आव्हानयामुळेच ठाणे नागरिक प्रतिष्ठानने या मेट्रो ४ (कासार वडवली ते वडाळा) यास उच्च न्यायालयात मेट्रो हवी पण ती भूमिगत मेट्रो हवी या मागणीसाठी आव्हान दिले असल्याचे सांगितले.यात ज्येष्ठ वास्तूविशारद नितीन किलावाला, पर्यावरण व नगर नियोजन अभ्यासक हेमा रमणी, पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी व अनिल शाळीग्राम यांचा या पत्रकार परिषदेत सहभाग होता.

टॅग्स :Metroमेट्रो