शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राज्यात पहिल्यांदाच महाशिवआघाडीचं दर्शन घडणार; महापौर निवडणूक बिनविरोध होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 16:57 IST

शिवसेनेच्या महापौरांना मातोश्रीकडून कमिटमेंट; पण महाशिवआघाडीमुळे अनेक नावं चर्चेत

ठाणे  -  एकीकडे ठाण्याचा महापौर कोण होणार यासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. परंतु दुसरीकडे महापौर कोणी झाला तरी त्याची निवड ही बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महापौर निवडणुकीत पहिल्यांदा महाशिवआघाडीचे दर्शन घडणार आहे. यामुळेच ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. शिवसेनेच्या श्रेष्ठींकडून नरेश म्हस्के यांना शब्द देण्यात आला असला तरी महाशिवआघाडीच्या निमित्ताने अनेक नावे चर्चेत आली आहेत.राज्यातील बहुतेक महापालिकांच्या महापौरांची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. यामध्ये ठाण्याची खुला प्रवर्गासाठी सोडत निघाल्याने आता पुढील सव्वा दोन वर्षे या खुर्चीवर कोण विराजमान होणार याची चर्चा सुरु झाली आहे. त्यानुसार पक्षाची पसंती ही सभागृह नेते नरेश म्हस्के यांना असली तरी, आता महापौर खुला प्रवर्गासाठी सोडत असल्याने अनेकांनी यासाठी दावा ठोकण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये देवराम भोईर यांचे नाव पुढे असून सध्याच्या विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कळव्यातील अनिता गौरी यांच्या नावाचीही चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र नरेश म्हस्के यांना पक्षाने महापौराबद्दल शब्द दिल्याचा दावा करण्यात आला असल्याने खासदार आणि आमदारांच्या पत्नींनी यातून माघार घेतल्याचे बालले जात आहे.यापूर्वी महापौर निवडणुकीत अनेक वेळा चुरस झाल्याचे पहावयास मिळाले होते. 2012 च्या महापौर पदाच्या निवडणुकीत सत्तेच्या जवळ येऊनही शिवसेनेला महापौरपदासाठी ठाणे बंदची हाक द्यावी लागली होती. त्यावेळेस मित्र पक्ष असलेला भाजपचा एक नगरसेवक गायब झाला होता. त्यामुळे सत्तेची समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु ऐनवेळेस मनसेने टाळी दिल्याने शिवसेनेला महापौरपद मिळाले होते. त्यानंतरही अडीच वर्षांनी पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेसही सत्ताधाऱ्यांना कसरत करावी लागली होती. परंतु ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आता वेगळे चित्र निर्माण झाले आहे. राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वाढली असल्याने त्याचे दर्शन आता ठाणे महापालिकेतही झाले आहे. नुकत्याच झालेल्या महासभेतसुद्धा या महाशिवआघाडीचे दर्शन झाले होते. त्यानंतर आता महापौर निवडणुकीतही हाच पॅटर्न दिसून येणार आहे.काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून महापौरपदाची निवडणूक लढविली जाणार नसल्याचे बोलले जात आहे. महाशिवआघाडी असल्याने या निवडणुकीतून राष्ट्रवादीने जवळ जवळ माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आता अनेकांनी महापौरपदावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेBJPभाजपा